शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

बीडमध्ये युतीची बसली, तर राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटलेलीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 12:54 IST

भाजप-शिवसेना यांच्यात झालेली समेट आणि राष्ट्रवादीचे बडे नेते शिवसेनेत दाखल झाल्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला.

मुंबई - एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झाली आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत बीडकरांनी राष्ट्रवादीला सपशेल बाजूला सारले असून भाजपला भरभरून मते दिली. बीड जिल्ह्यावर मजबूत पकड असणाऱ्या मुंडे कुटुंबियांपैकी धनंजय मुंडे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला कणखर नेता मिळाला असला तरी लोकसभा निवडणुकीत त्यांना स्वत:च्या मतदार संघात देखील पक्षाला आघाडी मिळवून देता आली नाही. त्यातच पक्षाचे दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी बसवण्याचे आव्हान धनंजय मुंडे यांच्यासमोर आहे.

लोकसभा निवडणुकीत मुंडे भगिनींनी राष्ट्रवादीला चांगलेच जेरीस आणले. बीड जिल्ह्यातील सहाच्या सहा मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली. यामध्ये आष्टी मतदार संघातून मतदारांनी सर्वाधिक ७० हजारहून अधिक मते भाजपच्या झोळीत टाकली. भाजप-शिवसेना यांच्यात झालेली समेट आणि राष्ट्रवादीचे बडे नेते शिवसेनेत दाखल झाल्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीसोडून शिवसेनेचा बाण हाती घेतला. गेल्या वेळचे बीडमधील भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणारे विनायक मेटे यांनी लोकसभेला मुंडे भगिनींविरुद्ध भूमिका घेतली होती. तरी देखील क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातून भाजपला ६ हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवून दिली. तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या केजमधूनही भाजपला २८ हजारांचे मताधिक्य मिळाले. गेवराईतही शिवसेनेचे बदामराव पंडित आणि भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या एकीमुळे भाजला आघाडी मिळाली असून आष्टी आणि माजलगावमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

एकूणच लोकसभा निवडणुकीत सहाच्या सहा मतदार संघात भाजपने आघाडी मिळवली असली तरी, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यात मोठा फरक असतो. विधानसभेला उमेदवारांवर निवडणुकीचा निकाल बऱ्यात प्रमाणात अवलंबून असतो. तर लोकसभेला राष्ट्रीय नेतृत्व पाहिले जाते. मात्र क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशाने जिल्ह्यात युतीला फायदाच होणार आहे. तर यातून मार्ग काढत राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्याचं खडतर आव्हान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आहे.