शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बीडमध्ये युतीची बसली, तर राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटलेलीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 12:54 IST

भाजप-शिवसेना यांच्यात झालेली समेट आणि राष्ट्रवादीचे बडे नेते शिवसेनेत दाखल झाल्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला.

मुंबई - एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झाली आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत बीडकरांनी राष्ट्रवादीला सपशेल बाजूला सारले असून भाजपला भरभरून मते दिली. बीड जिल्ह्यावर मजबूत पकड असणाऱ्या मुंडे कुटुंबियांपैकी धनंजय मुंडे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला कणखर नेता मिळाला असला तरी लोकसभा निवडणुकीत त्यांना स्वत:च्या मतदार संघात देखील पक्षाला आघाडी मिळवून देता आली नाही. त्यातच पक्षाचे दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी बसवण्याचे आव्हान धनंजय मुंडे यांच्यासमोर आहे.

लोकसभा निवडणुकीत मुंडे भगिनींनी राष्ट्रवादीला चांगलेच जेरीस आणले. बीड जिल्ह्यातील सहाच्या सहा मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली. यामध्ये आष्टी मतदार संघातून मतदारांनी सर्वाधिक ७० हजारहून अधिक मते भाजपच्या झोळीत टाकली. भाजप-शिवसेना यांच्यात झालेली समेट आणि राष्ट्रवादीचे बडे नेते शिवसेनेत दाखल झाल्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीसोडून शिवसेनेचा बाण हाती घेतला. गेल्या वेळचे बीडमधील भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणारे विनायक मेटे यांनी लोकसभेला मुंडे भगिनींविरुद्ध भूमिका घेतली होती. तरी देखील क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातून भाजपला ६ हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवून दिली. तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या केजमधूनही भाजपला २८ हजारांचे मताधिक्य मिळाले. गेवराईतही शिवसेनेचे बदामराव पंडित आणि भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या एकीमुळे भाजला आघाडी मिळाली असून आष्टी आणि माजलगावमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

एकूणच लोकसभा निवडणुकीत सहाच्या सहा मतदार संघात भाजपने आघाडी मिळवली असली तरी, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यात मोठा फरक असतो. विधानसभेला उमेदवारांवर निवडणुकीचा निकाल बऱ्यात प्रमाणात अवलंबून असतो. तर लोकसभेला राष्ट्रीय नेतृत्व पाहिले जाते. मात्र क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशाने जिल्ह्यात युतीला फायदाच होणार आहे. तर यातून मार्ग काढत राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्याचं खडतर आव्हान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आहे.