शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

युतीसाठी फोन कुणी करायचा? शिवसेना-भाजपात रंगलं मानापमान नाट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 09:56 IST

बाळासाहेबांच्या वाटेने आपल्याला जायचं आहे याचा आग्रह जो शिवसैनिक धरेल त्यानं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना गुरुदक्षिणा दिल्यासारखं होईल असं केसरकर यांनी सांगितले.

मुंबई - राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला तो स्वागतार्ह आहे. एका आदिवासी समाजातील महिलेला पुढे आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. भारतीय संस्कृतीशी त्यांना पूर्ण माहिती आहे. उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला तो बाळासाहेबांची जी परंपरा आहे त्याला अनुसरून घेतलेला आहे अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

दीपक केसरकर म्हणाले की, शिवसेना हे कुटुंब आहे. आम्हाला २-३ लाख लोकं निवडून देतात. बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर आधारित आमचा विचार आहे. आपल्याला ते हिंदुत्व घेऊन पुढे जायचं आहे. बाळासाहेबांनी कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली नसती. उद्धव ठाकरे यांना नाईलाजास्तव महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांनी आपल्याला जे सांगितले ते ऐकायचं की पवारांचे ऐकायचं हे शिवसैनिकांनी ठरवावं असं त्यांनी सांगितले. 

तसेच बाळासाहेबांच्या वाटेने आपल्याला जायचं आहे याचा आग्रह जो शिवसैनिक धरेल त्यानं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना गुरुदक्षिणा दिल्यासारखं होईल. शिवसेना-भाजपात मानापमान नाट्य आहे. कुठेतरी मनं दुखावली गेली आहेत. ही मनं जुळली तर महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त होईल. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा पर्याय उद्धव ठाकरेंनी पुढे आणला होता. परंतु यात बदल शरद पवारांनी केला. अनेकजण माझ्यावर वैयक्तिक टीका करतात. मला जागा देऊन कुणी उपकार केले नाहीत. दोनदा राष्ट्रवादीचा उमेदवार पराभव झाला तेव्हा मला जागा दिली. मी २५ हजार मतांनी जिंकलो. शिवसेनेत आलो ४५ हजार मतांनी जिंकलो. आमचं लोकांमध्ये काम असतं म्हणून निवडून येतो असा टोला दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी नेत्यांना लगावला. 

त्याचसोबत भूतकाळात वावरू नको. शरद पवारांना पुन्हा सत्तेत यायचं आहे. शिवसेनेने पवारांच्या पालखीचे भोई होऊ नये. शिवसेना चार वेळा फुटली ती शरद पवारांमुळेच आहे. जे घडलं ते सांगण्यात कुठे पाप आहे का? मराठी माणसाला ताठ मानाने जगायला बाळासाहेबांनी शिकवलं. आज, उद्या आम्ही शिवसैनिक आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाऊ. कुणी कुणाला फोन आधी करायचा हे त्यांनी ठरवावं. कलम ३७०, राम मंदिर हे बाळासाहेबांचे विचार होते ते पूर्ण करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केले. मानापमान नाट्यात महाराष्ट्राचं हित जोपासलं जावं असं दीपक केसरकर यांनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा