शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

युतीसाठी फोन कुणी करायचा? शिवसेना-भाजपात रंगलं मानापमान नाट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 09:56 IST

बाळासाहेबांच्या वाटेने आपल्याला जायचं आहे याचा आग्रह जो शिवसैनिक धरेल त्यानं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना गुरुदक्षिणा दिल्यासारखं होईल असं केसरकर यांनी सांगितले.

मुंबई - राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला तो स्वागतार्ह आहे. एका आदिवासी समाजातील महिलेला पुढे आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. भारतीय संस्कृतीशी त्यांना पूर्ण माहिती आहे. उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला तो बाळासाहेबांची जी परंपरा आहे त्याला अनुसरून घेतलेला आहे अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

दीपक केसरकर म्हणाले की, शिवसेना हे कुटुंब आहे. आम्हाला २-३ लाख लोकं निवडून देतात. बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर आधारित आमचा विचार आहे. आपल्याला ते हिंदुत्व घेऊन पुढे जायचं आहे. बाळासाहेबांनी कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली नसती. उद्धव ठाकरे यांना नाईलाजास्तव महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांनी आपल्याला जे सांगितले ते ऐकायचं की पवारांचे ऐकायचं हे शिवसैनिकांनी ठरवावं असं त्यांनी सांगितले. 

तसेच बाळासाहेबांच्या वाटेने आपल्याला जायचं आहे याचा आग्रह जो शिवसैनिक धरेल त्यानं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना गुरुदक्षिणा दिल्यासारखं होईल. शिवसेना-भाजपात मानापमान नाट्य आहे. कुठेतरी मनं दुखावली गेली आहेत. ही मनं जुळली तर महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त होईल. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा पर्याय उद्धव ठाकरेंनी पुढे आणला होता. परंतु यात बदल शरद पवारांनी केला. अनेकजण माझ्यावर वैयक्तिक टीका करतात. मला जागा देऊन कुणी उपकार केले नाहीत. दोनदा राष्ट्रवादीचा उमेदवार पराभव झाला तेव्हा मला जागा दिली. मी २५ हजार मतांनी जिंकलो. शिवसेनेत आलो ४५ हजार मतांनी जिंकलो. आमचं लोकांमध्ये काम असतं म्हणून निवडून येतो असा टोला दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी नेत्यांना लगावला. 

त्याचसोबत भूतकाळात वावरू नको. शरद पवारांना पुन्हा सत्तेत यायचं आहे. शिवसेनेने पवारांच्या पालखीचे भोई होऊ नये. शिवसेना चार वेळा फुटली ती शरद पवारांमुळेच आहे. जे घडलं ते सांगण्यात कुठे पाप आहे का? मराठी माणसाला ताठ मानाने जगायला बाळासाहेबांनी शिकवलं. आज, उद्या आम्ही शिवसैनिक आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाऊ. कुणी कुणाला फोन आधी करायचा हे त्यांनी ठरवावं. कलम ३७०, राम मंदिर हे बाळासाहेबांचे विचार होते ते पूर्ण करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केले. मानापमान नाट्यात महाराष्ट्राचं हित जोपासलं जावं असं दीपक केसरकर यांनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा