शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

युतीसाठी फोन कुणी करायचा? शिवसेना-भाजपात रंगलं मानापमान नाट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 09:56 IST

बाळासाहेबांच्या वाटेने आपल्याला जायचं आहे याचा आग्रह जो शिवसैनिक धरेल त्यानं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना गुरुदक्षिणा दिल्यासारखं होईल असं केसरकर यांनी सांगितले.

मुंबई - राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला तो स्वागतार्ह आहे. एका आदिवासी समाजातील महिलेला पुढे आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. भारतीय संस्कृतीशी त्यांना पूर्ण माहिती आहे. उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला तो बाळासाहेबांची जी परंपरा आहे त्याला अनुसरून घेतलेला आहे अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

दीपक केसरकर म्हणाले की, शिवसेना हे कुटुंब आहे. आम्हाला २-३ लाख लोकं निवडून देतात. बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर आधारित आमचा विचार आहे. आपल्याला ते हिंदुत्व घेऊन पुढे जायचं आहे. बाळासाहेबांनी कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली नसती. उद्धव ठाकरे यांना नाईलाजास्तव महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांनी आपल्याला जे सांगितले ते ऐकायचं की पवारांचे ऐकायचं हे शिवसैनिकांनी ठरवावं असं त्यांनी सांगितले. 

तसेच बाळासाहेबांच्या वाटेने आपल्याला जायचं आहे याचा आग्रह जो शिवसैनिक धरेल त्यानं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना गुरुदक्षिणा दिल्यासारखं होईल. शिवसेना-भाजपात मानापमान नाट्य आहे. कुठेतरी मनं दुखावली गेली आहेत. ही मनं जुळली तर महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त होईल. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा पर्याय उद्धव ठाकरेंनी पुढे आणला होता. परंतु यात बदल शरद पवारांनी केला. अनेकजण माझ्यावर वैयक्तिक टीका करतात. मला जागा देऊन कुणी उपकार केले नाहीत. दोनदा राष्ट्रवादीचा उमेदवार पराभव झाला तेव्हा मला जागा दिली. मी २५ हजार मतांनी जिंकलो. शिवसेनेत आलो ४५ हजार मतांनी जिंकलो. आमचं लोकांमध्ये काम असतं म्हणून निवडून येतो असा टोला दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी नेत्यांना लगावला. 

त्याचसोबत भूतकाळात वावरू नको. शरद पवारांना पुन्हा सत्तेत यायचं आहे. शिवसेनेने पवारांच्या पालखीचे भोई होऊ नये. शिवसेना चार वेळा फुटली ती शरद पवारांमुळेच आहे. जे घडलं ते सांगण्यात कुठे पाप आहे का? मराठी माणसाला ताठ मानाने जगायला बाळासाहेबांनी शिकवलं. आज, उद्या आम्ही शिवसैनिक आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाऊ. कुणी कुणाला फोन आधी करायचा हे त्यांनी ठरवावं. कलम ३७०, राम मंदिर हे बाळासाहेबांचे विचार होते ते पूर्ण करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केले. मानापमान नाट्यात महाराष्ट्राचं हित जोपासलं जावं असं दीपक केसरकर यांनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा