शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Maharashtra Political Crisis: “राज्यपाल कोश्यारी म्हणजे घरगडी आहेत”; टीका करताना शिवसेना नेत्याची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 08:52 IST

Maharashtra Political Crisis: प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करताना भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्ष कसा वाचवणार, अशी विचारणा शिवसेना नेत्याने केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचा रखडलेला विस्तार, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आणि राज्यपालांचे मराठी भाषिकांविरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद यांमुळे राज्याचे राजकारण आताच्या घडीला चांगलेच तापले आहे. यातच शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर टीका करताना जीभ घसरल्याचे सांगितले जात आहे. राज्यपाल हे घरगडी आहेत, अशी आक्षेपार्ह टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. 

राज्यपाल कोश्यारींनी मराठी माणसांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरुन लक्ष हटवण्यासाठी संजय राऊत यांना अटक केल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना संजय राऊत यांनी पत्र लिहिले होते. ५ ऑगस्टपर्यंत ईडीकडे मुदत मागितली होती. अधिवेशन संपल्यानंतर ७ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचेही सांगितले होते. पण राऊतांच्या पत्राला कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच ईडीने त्यांच्यावर कारवाई केली, असे भास्कर जाधव म्हणाले. 

अशा माझ्या शुभेच्छा आहेत

देशात भाजपकडून दडपशाही सुरु आहे. राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊच नये. त्याची गरजच नाही. आता लोकांना लोकशाही काय आहे, ते समजले. बिनखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस सर्व कार्यक्रम भाजपचेच राबवतायत. म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार न होता भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम राबवला जावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत, असा टोलाही भास्कर जाधव यांनी लगावला. यापुढील शिवसेनेची लढाई खुल्या मैदानात होईल. एकाने दुसऱ्याला गिळावे, दुसऱ्याने तिसऱ्याला गिळावे हाच जगाचा न्याय खरा, हीच जगाची परंपरा, तू जपून टाक पाऊल जरा, तू जपून टाक पाऊल जरा, असेही जाधव म्हणाले. प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करताना भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्ष कसा वाचवणार? असा रोकडा सवालही भास्कर जाधव यांनी केला आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीला गेले. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी या पार्श्वभूमीवर दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारीसुद्धा दिल्लीत आहेत.   

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBhaskar Jadhavभास्कर जाधवShiv Senaशिवसेना