शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

'सीएम'पदाच्या शर्यतीत सेना 'बॅकफूटवर' ? म्हणाले, जनआशीर्वाद यात्रा अराजकीयच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 17:05 IST

आगामी विधानसभा निवडणूक आणि जनआशीर्वाद यात्रेचा काहीही संबंध नसल्याचे आदित्य यांनी नमूद केले. त्यामुळे आदित्य आणि शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतातून एक पाऊल मागे तर घेतले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकत आणि त्यानुसार पक्षातून स्वबळावर लढण्यासंदर्भात सुरू असलेली चाचपणी, शिवसेनेची धाकधुक वाढवणारी आहे. नुकत्याच आलेल्या अंतर्गत सर्व्हेत भाजपला राज्यात स्पष्ट बहुमत दाखविण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक झालेल्या शिवसेनेने एक पाऊल मागे घेतल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळीच भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती निश्चित झाली होती. विधानसभा निवडणुकीला देखील दोन्ही पक्ष एकत्रच निवडणुकीला सामोरे जातील असं ठरलंही आहे. त्यानुसार २०१४ मध्ये मोठा भाऊ म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेकडून भाजप-सेना जुळे भाऊ असल्याचे सांगण्यात आले. परंतु, मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, असंही शिवसेनेकडून सांगण्यात आले. तर खासदार संजय राऊत यावरच थांबले नसून त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे शिवसेनेचे उमेदवार असतील, असंही जाहीर करून टाकलं. त्यानुसार शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा सुरू असल्याचे भासविण्यात आले.

दरम्यान शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे यांची दावेदारी सांगणे भाजपला रुचलेले दिसत नाही. त्यातच भाजपमध्ये होत असलेली इनकमिंग आणि अंतर्गत सर्व्हे यामुळे सेना बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे. सर्व्हेत सेना बहुमतापासून दूर दाखविण्यात आली आहे. अशा स्थितीत खुद्द आदित्य ठाकरे यांनीच जनआशीर्वाद यात्रा राजकीय नसल्याचे स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणूक आणि जनआशीर्वाद यात्रेचा काहीही संबंध नसल्याचे आदित्य यांनी नमूद केले. त्यामुळे आदित्य आणि शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतातून एक पाऊल मागे तर घेतले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.