शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी शिवसेना झाली सतर्क, आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात केले बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 18:48 IST

येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

मुंबई - राज्यसभा निवडणुकीच्या निकालानं राज्यातील राजकीय वातावरण बदलून टाकलं आहे. या निवडणुकीत भाजपाने संख्याबळ नसतानाही तिन्ही उमेदवार निवडून आणल्यानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. अपक्ष आणि घटक पक्षाच्या मतांनी गडबड केली. महाविकास आघाडी समर्थक ९ ते १० मते भाजपाच्या पारड्यात गेल्याने शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला पराभव सहन करावा लागला. त्यामुळे शिवसेना आता आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी सतर्क झाली आहे.

येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या अयोध्या दौऱ्यासाठी आता केवळ शिवसैनिक आदित्य ठाकरेंच्या सोबत जातील तर आमदारांना दौऱ्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. भाजपाने या निवडणुकीत ५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर अपक्ष उभे असलेले सदाभाऊ खोत यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. 

१५ जूनला आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी मोजकेच नेते वगळता आमदारांना दौऱ्यावर जाता येणार नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने ही भूमिका घेतली आहे. विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे आमदार फुटण्याच्या भीतीने नेतृत्वाने सतर्कता बाळगली आहे. पुढील काही दिवस आमदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने २ उमेदवार उतरवले आहेत. ते पक्षाच्या बळावरच निवडून आणण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. 

"'मविआ' आमदारांमध्ये नाराजी, भाजपाला फायदा होईल"सत्तारुढ पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करावी असा प्रयत्न होता. परंतु महाविकास आघाडीत समन्वय नसल्याने ही निवडणूक लादली. आम्ही पाचवा उमेदवार उभा केला आहे. ही जागा निवडून आणू असा विश्वास आहे. सत्ताधारी पक्षाने माझ्याशी चर्चा झाली. काँग्रेसनं उमेदवार मागे घ्यावा अशी चर्चा झाली. परंतु काँग्रेसनं उमेदवार मागे न घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे ही निवडणूक होणार आहे असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. 

तसेच महाविकास आघाडीत असमन्वय आहे. त्यामुळे या निवडणुकीत ही नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. मी चमत्कारावर विश्वास ठेवत नाही. आमचा उमेदवार निवडून येईल हा विश्वास आहे. आम्ही ६ जागा लढवायच्या की ५ जागा लढवायची ही चर्चा झाली. या चर्चेनंतर ५ जागा लढवण्याबाबत एकमत झाले. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितला. सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये नाराजी आहे. त्याचा फायदा आम्हाला होईल असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAyodhyaअयोध्याShiv SenaशिवसेनाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक