शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शिरूर तालुक्यात काँग्रेस एकीला सुरूंग

By admin | Updated: October 31, 2016 01:18 IST

काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची निवड करताना विश्वासात घेतले नाही.

शिरूर : काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची निवड करताना विश्वासात घेतले नाही. तसेच निष्ठावान, सक्षम कार्यकर्ते सोडून नातेसंबंध जोपासत आपल्याजवळच्या व्यक्तीला जिल्हाध्यक्षांनी अध्यक्षपद बहाल केले, असा आरोप करीत तालुक्यातील ज्येष्ठ व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आज पदाचे व सदस्यत्वाचे राजीनामे दिले. जिल्हा युवकचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही या कारणास्तव राजीनामा दिला आहे.आज पत्रकार परिषदेत जिल्हा युवकचे अध्यक्ष कंद, तालुकाध्यक्ष विजेंद्र गद्रे व ज्येष्ठ नेते सुरेश थोरात यांनी राजीनाम्याची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे राजीनामे पाठविण्यात आले असून याबाबत ज्येष्ठ नेत्यांकडेही राजीनामे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हाध्यक्ष जगताप यांनी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी नुकतीच सणसवाडी येथील वैैभव यादव यांची नियुक्ती केली. या नियुक्तीवर नाराज झालेल्या तालुक्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामे दिले. याबाबत कंद म्हणाले, ‘‘तालुकाध्यक्ष निवडीबाबत विश्वासात घेतले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र या निवडीबाबत तालुक्यातील कोणालाही विश्वासात घेण्यात आले नाही.’’ थोरात म्हणाले, ‘‘तालुक्याची कसलीही माहिती नसलेल्या, राजकीय गोष्टींची पार्श्वभूमी नसणाऱ्या, तसेच पक्षाला फारसा परिचित नसलेल्या व्यक्तीला तालुका काँग्रेसचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. ही निवड पूर्णपणे चुकीची असून तालुक्यात गेली ३० ते ३५ वर्षे प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस जिवंत ठेवणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ही निवड करण्यात आली आहे.’’ गद्रे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्या शिफारशीवर जगताप यांनी यादव यांची निवड केली आहे. काँग्रेसच्या एकाही सदस्याने अथवा नेत्याने त्यांची शिफारस केलेली नाही. जगताप यांचा मनमानी पद्धतीने तालुकाध्यक्षाची निवड केली असल्याचा सर्वांनी आरोप केला.’’ यादव यांची निवड रद्द करून तालुक्यातील ज्येष्ठ, निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन योग्य व्यक्तीची निवड करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.कंद यांच्यासह तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप करंजुळे, युवक तालुकाध्यक्ष (शिरूर-हवेली) विजेंद्र गद्रे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब फडतरे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शोभाताई वाघचौरे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश थोरात, युवकचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र मांढरे, माजी शहराध्यक्ष रुपेश गंगावणे, तालुका उपाध्यक्ष महेश जगदाळे, युवक शहराध्यक्ष अमजद पठाण, नवनाथ सासवडे, भाऊसाहेब साकोरे, अनिल सातव, चंद्रकांत सकट, सतीश वाबळे, शशिकला सातपुते, बापू ओव्हाळ आदींनी आपल्या पदाचे व काँग्रेस सदस्यत्वाचे राजीनामे दिले. >काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची २ महिन्यांपूर्वी शहरात निर्घृण हत्या झाली. १५ दिवसांपूर्वी काँग्रेसचे शहराध्यक्ष केशरसिंग परदेशी यांचे निधन झाले. मात्र पक्षाच्या या निष्ठावंतांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करण्याचे मोठेपण संजय जगताप यांना दाखवता आले नाही. ज्येष्ठ नेत्यांबद्दल अशी भावना असेल तर कार्यकर्त्यांबद्दल त्यांना काय आदर असणार, असा संतप्त सवालही पत्रकार परिषदेत करण्यात आला.