शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

“अजित पवार गट घेऊन आले तर स्वागत करु, NCPसह आल्यास शिवसेना सत्तेत राहणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 13:21 IST

Maharashtra Politics: पार्थ पवार यांचा पराभव झाल्यापासून अजित पवार नाराज आहेत. अजित पवार यांना आता राष्ट्रवादीत राहायचे नाही, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: पार्थ पवार यांचा पराभव झाल्यापासून अजित पवार नाराज आहेत. महाविकास आघाडीची सत्ता असताना काही कामांसाठी उद्धव ठाकरे यांची भेट अजित पवार यांनी अनेकदा मागितली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भेट दिली नाही. आजही महाविकास आघाडीच्या सभांमध्ये अजित पवार यांचे स्थान शोधावे लागते. अजित पवार स्वतःचा गट घेऊन आमच्यासोबत सत्तेत आले तर त्यांचे स्वागतच करू. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून पाठिंबा देत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीचाच भाग होतो. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणे आम्हाला मान्य नव्हते. म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो. मात्र, अजित पवारांच्या नाराजीवर चर्चा सुरू आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून अजित पवार काही आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही शिवसेना सत्तेत राहणार नाही. मात्र, स्वतः गट घेऊन अजित पवार भाजप किंवा शिवसेनेत येणार असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे  संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले. 

नागपूरच्या सभेत अजित पवारांना बोलू दिले गेले नाही

नागपूरला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. त्यात अजित पवार यांना बोलू दिले नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल, १६ आमदार अपात्र होतील आणि सत्ता जाईल, या गोष्टींना काही अर्थ नाही, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. पूर्वी सत्ता होती म्हणून हे सगळे जण एकत्र असल्याचे दाखवत होते. मात्र, आता या सगळ्यांचे वेगवेगळ्या दिशेला मार्गक्रमण सुरू आहे. राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांचा आपापसात बेबनाव आहे. अजित पवार अद्यापपर्यंत त्यावर बोललेले नाहीत. अजित पवार यांना आता राष्ट्रवादीत राहायचे नाही. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली तर आणि तरच आम्ही त्यांचे निश्चित स्वागत करू. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाईल, असा जो काही लोकांचा कयास आहे. तसे झाले तर आम्ही सत्तेत राहणार नाही, असे संजय  शिरसाट यांनी म्हटले आहे. 

केवळ अजित पवार नाही, तर काँग्रेसमध्येही चलबिचल सुरू 

राष्ट्रवादी सोडून अजित पवार भाजपमध्ये जाणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. आमच्याकडे आले तरी स्वागत आहे. अजितदादा नॉट रिचेबल होणे नवीन नाही. सगळा फोकस अजित पवारांवर गेला आहे. सर्वोच्च न्यायालयातील केस आणि अजित पवारांची नाराजी, यामध्ये काहीही संबंध नाही, असे सांगताना केवळ अजित पवार नाही, तर काँग्रेसमध्येही चलबिचल सुरू आहे. त्यांच्या आकड्यांचीही बेरीज जुळूत नाही. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना आता आघाडीत राहू नये, असे वाटत असल्याचा दावाही संजय शिरसाट यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी