शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे शिवसेनेचे मालक समजत होते का? केवळ भावनात्मक वातावरण तयार करतायत” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 19:34 IST

Maharashtra News: ठाकरे गटाची पायाखालची वाळू सरकली आहे. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसमोर केवळ भावनात्मक वातावरण तयार करत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. आगामी कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत ठाकरे गटाला आताचे नाव आणि चिन्ह वापरता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच शिंदे गटाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे मालक समजत होते का? अशी विचारणा शिंदे गटाने केली आहे. 

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गट, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयानंतर कुत्र्याचे उदाहरण देत संजय राऊतांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. यावर बोलताना, आतापर्यंतचे कार्यकर्ते काम करत होते ते कुत्रे होते का असे संजय राऊत यांना म्हणायचे आहे का, संजय राऊत शिवसैनिकांना कुत्रा बोलत आहेत. खासदार संजय राऊत यांच्या वाक्यातून उद्धव ठाकरे कशाप्रकारे सूचनांवर चालत होते हे सत्य महाराष्ट्राला कळले आहे, असा पलटवार नरेश म्हस्के यांनी केला. 

उद्धव ठाकरे शिवसेनेचे मालक समजत होते का?

उद्धव ठाकरे शिवसेनेचे मालक समजत होते का? पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे आल्याने आता ठाकरे गटाची पायाखालची वाळू सरकली आहे. त्याचमुळे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसमोर केवळ भावनात्मक वातावरण तयार करत आहेत, अशी खोचक टीका म्हस्के यांनी केली. निशाणी हा चोरायचा विषय नसतो कारण शिंदे गटाकडे आता सर्वात जास्त खासदार आणि आमदार हे आमच्या बाजूने आहेत. शिंदे गटाला पक्ष आणि चिन्हे मिळाल्याची महत्वाची कारणं आहेत. कारण ज्या दिवसांपासून महाविकास आघाडचे सरकार अस्तित्वात आले होते. तेव्हापासून ठाकरे गटाने शिवसेनेला राष्ट्रवादीच्या ताटाखालचं मांजर बनवले होते असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. आतापर्यंत तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विसरून तुम्ही बुरखा घालून राष्ट्रवादीच्या मागे पुढे फिरत होता, या शब्दांत म्हस्के यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, दसरा मेळाव्यावेळी त्यांच्या बाजूने निर्णया लागला तेव्हा यांचा न्यायदेवतेवर विश्वास होता. परंतु आता न्यायदेवतेच्या विरोधात हे बोलत आहेत. खासदार संजय राऊत हे आमच्या आमदार आणि खासदारांच्या मतांवरून तुम्ही खासदार बनलेले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना ही आम्हीच वाढवली, असे नरेश म्हस्के म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे