शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Maharashtra Politics: “शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्हणून मध्यावधी निवडणुकांचं खेळणं हाती”; शिंदे गटाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 12:37 IST

Maharashtra News: आमच्याप्रमाणे भाजपच्या संपर्कातही शिवसेना ठाकरे गटाचे अनेक आमदार आहेत, असा दावा श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

Maharashtra Politics: गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी होताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार आले. यानंतर शिवसेनेकडून सातत्याने राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचा दावा केला जात आहे. याला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाचा समचार घेताना, शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्हणून मध्यावधी निवडणुकांचे खेळणे हाती दिले जात आहे, अशी टीका केली आहे. 

राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांना एका बैठकीदरम्यान दिले. यानंतर राज्यातील मध्यावधी निवडणुकांवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचे एक स्टेबल सरकार राज्यात आलेले आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार अशी वक्तव्ये प्लॅनिंग करून केली जातात, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. 

आमच्याप्रमाणे भाजपच्या संपर्कातही अनेक आमदार

श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, आमच्या संपर्कात अनेक आमदार आहेत. आमच्याप्रमाणे भाजपच्या संपर्कातही अनेक आमदार आहेत. जे काही शिल्लक आमदार आहेत, ते कुठेही जाऊ नयेत. म्हणून मध्यावधी निवडणुकांचे एक खेळणे त्यांच्या हाती दिले जात आहे. जनतेसाठी काम करणारे सरकार आले आहे. त्यामुळे पुढील निवडणूक जेव्हा लागेल, तेव्हा यांची काय परिस्थिती होईल, या विचारानेच यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, अशी घणाघाती टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. 

दरम्यान, मध्यावधी निवडणुकांच्या विधानावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, काही जणांना पोटशूळ उठलेले आहे की, तीन महिन्यात हे सरकार एवढे काम करत आहे, मग हेच पुढचे अडीच वर्ष चालू राहिले तर काय परिस्थिती होईल? याची चिंता आणि भ्रांत त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. कारण आघाडीतही काही आलबेल दिसत नाही. मध्यावधी निवडणुका लागतील असे बोलत आहेत. तुमचे लॉजिक काय, अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना