शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

“राज-उद्धव यांचे भांडण कधीच मिटले असते, परंतु...”; शिंदे गटाच्या खासदाराचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 13:23 IST

Raj Thackeray And Uddhav Thackeray: ४० आमदार, १३ खासदार सोडून का गेले? याचे चिंतन उद्धव ठाकरेंनी केले नाही. त्यांना नात्याचे महत्त्व नाही, असा पलटवार शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

Raj Thackeray And Uddhav Thackeray: आधी शिवसेना आणि त्यानंतर एका वर्षाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बंड झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. यातच हिंगोलीत उद्धव ठाकरेंनी निर्धार सभेला संबोधित करताना शिवसेना शिंदे गटावर सडकून टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना, शिंदे गटातील खासदारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे कधीच मिटले असते, असा दावा केला आहे. 

उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीच्या सभेत खासदार भावना गवळी यांच्यावर टीका केली. गेल्या वर्षीचे रक्षाबंधन तुम्हाला आठवते का? पंतप्रधानांना राखी बांधतानाचा एकच फोटो आला होता. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडीची चौकशी थांबली, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. याला भावना गवळी यांनी उत्तर दिले. 

राज-उद्धव यांचे भांडण कधीच मिटले असते, परंतु...

उद्धव ठाकरे यांनी पवित्र नात्यावर सतत वक्तव्य केले आहे. कदाचित उद्धव ठाकरे यांना नात्याचे महत्त्व कळत नसेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे भांडण कधीच संपले असते. पण, उद्धव ठाकरेंनी त्यावर निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीसांबरोबरही उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. उद्धव ठाकरे यांनी कधीही कोणाला चांगली वागणूक दिली नाही. ४० आमदार आणि १३ खासदार सोडून का गेले? याचे चिंतन उद्धव ठाकरे यांनी केले नाही. मी पाचवेळा खासदार म्हणून निवडून आली. माझ्या मतदारसंघात २४ वर्षापासून रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबवत आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांना राखी बांधली आहे. या बंधनावर उद्धव ठाकरे यांनी बोलू नये. उद्धव ठाकरे यांनी कधीही बंधन पाळले नाही. म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे, या शब्दांत भावना गवळी यांनी सडेतोड पलटवार केला.

दरम्यान, पक्षातील खासदार आमदार यांच्यासोबतही ते नाते जपू शकले नाहीत. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते. मात्र त्यांच्यावरही टीका करीत आहे. जे एकनाथ शिंदे खांद्याला खांदा लावून उद्धव ठाकरेंसोबत काम करीत होते, त्यांच्यावर टीका केली जात आहे. स्वतः नाते जपण्यात अपयशी ठरायचे आणि दुसऱ्यावर टीका करायची हा मूळात त्यांच्यातील दोष असल्याचा आरोप भावना गवळी यांनी केला.

 

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे