शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

“भास्कर जाधव सिनियर नेते, मार्गदर्शन-अनुभवाची गरज, पक्षात आले तर आवडेल”; शिंदे गटाची खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:43 IST

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: भास्कर जाधव यांच्या पक्षप्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे मत नेत्यांनी मांडले आहे.

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट, भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने केली असली, तरी पक्षाला लागत असलेली गळती सुरूच असल्याचे दिसत आहे. संजय राऊतांनी ठाकरे गटाची स्वबळाची भूमिका मांडली. यापुढे आता भास्कर जाधव यांनी केलेल्या विधानावरून आता प्रतिक्रिया उमटत आहेत.

पदांचा म्हणजे शाखाप्रमुख वगैरे पदांचा कालावधी जर निश्चित केला. तर तेवढ्या कालावधीमध्ये काम करण्याकरिता ते स्पर्धा करतील. नपेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे. जवळजवळ काँग्रेसच झाली आहे. हे बोलताना वेदना होतात. एखाद्या गावात शिवसेनेचा कार्यक्रम असला की त्या गावातील शाखाप्रमुखाच्या अंगात संचार झालेला असायचा. आता शाखाप्रमुख कोण आहेत, किती आहेत, कुठे आहेत, याचा पहिल्यांदा आढावा घ्यायला हवा. काही पदाधिकारी दहा-पंधरा वर्षांपासून एका जागेवर मस्तपैकी बसलेले आहेत. माझ्या पदाला कुणी हात लावू शकत नाही, असा त्यांचा समज झालेला आहे. मी कुठल्यातरी नेत्याची मर्जी सांभाळली की, माझे पद शाबूत, आहेत कुठे हे शाखाप्रमुख? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षरित्या भास्कर जाधव यांना शिंदे गटात येण्याची ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे.

भास्कर जाधव सिनियर नेते, मार्गदर्शन-अनुभवाची गरज, पक्षात आले आवडेल

भास्कर जाधव जे आता बोलत आहेत, ते आम्ही अडीच वर्षांपूर्वी केले. आता त्यांची घुसमट का होत आहे, हे त्यांना विचारा. भास्कर जाधव सिनियर नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाची, अनुभवाची आम्हाला गरज आहे. भास्कर जाधवांना शिवसेना पक्षात घ्यायचे की नाही हा निर्णय शिंदे साहेब घेतील. पण, मी सांगतो ते खूप मोठे नेते आहेत, आम्हाला ते आमच्या पक्षात आले तर आवडेल, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

दरम्यान, भास्कर जाधव काय बोलले हे माध्यमातून समजत आहे. त्यांच्याशी चर्चा करेन. भास्कर जाधव यांचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे. पक्ष संघर्ष आणि संकटातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाBhaskar Jadhavभास्कर जाधव