शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अजितदादा सकाळी दात न घासताच शपथविधीला गेले होते, कारण..; शिंदे गटाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 16:30 IST

जर आमची गद्दारी होती तर काँग्रेससोबत शरद पवारांनी केलेली गद्दारी नव्हती का? असा सवाल शिंदे गटाने अजित पवारांना विचारला आहे.

पुणे - अजित पवारांची टीका म्हणजे स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी परिस्थिती अजितदादांची झाली आहे. अजितदादा २३ नोव्हेंबरच्या पहाटेच्या शपथविधीसाठी दात न घासताच गेले होते कारण त्यांना घाई होती असं एका राष्ट्रवादी नेत्यानेच मला सांगितले. त्यांनी जो उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी केला ती गद्दारी होती की शरद पवारांविरोधात उठाव होता असा प्रश्न शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांना विचारला आहे. 

नरेश म्हस्के म्हणाले की, ज्यावेळी अजित पवार यांनी शपथविधी केला तेव्हा जे स्वत:ला पवारांचे पुत्र म्हणतात त्यांनी आम्हाला फोन करून अजितदादांचे पुतळे जाळा असा फोन केला होता. राष्ट्रवादीच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनीही पुतळेही जाळले होते. मग अजित पवारांनी जो प्रकार केला होता त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यांचे पुतळे जाळले का? आपण काय केलंत? पहाटेचा शपथविधी केला त्याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी करणं गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत १० जून १९९९ राष्ट्रवादी पक्षाची स्थापना, आम्ही काँग्रेसपासून वेगळे आहोत असं पवारांनी पत्र लिहिलं होते. ती गद्दारी नव्हती का?, जर आमची गद्दारी होती तर काँग्रेससोबत शरद पवारांनी केलेली गद्दारी नव्हती का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या विचारांवर पक्ष वाढवला. मुळात शिवसेना संपवण्याचं काम संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राष्ट्रवादीने केले आहे. ग्रामीण भागात शिवसैनिकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात लढून पक्ष वाढवला. त्या शिवसैनिकांना संपवण्याचं काम राष्ट्रवादीनं केले. त्यामुळे शिवसेना टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बंड नव्हे तर उठाव केला आहे असंही नरेश म्हस्के म्हणाले. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांची सभा, त्यांची कारकिर्द, लोकांचा प्रतिसाद पाहून संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडलंय. राऊतांचा भोंगा सकाळी सुरू होतो. संजय राऊतांना कोण विचारतंय? फक्त सकाळी भुंकणे हेच राऊत करतात. त्यांनी लोकांसाठी काय केलंय? असा सवाल नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना केला आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस