शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

Maharashtra Politics: “तुरुंगातून बाहेर पडल्यावर संजय राऊतांची भाषा बदलली, पण...”; शिंदे गटाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 15:21 IST

Maharashtra News: संजय राऊत विकासाची भाषा बोलत होते, असे सांगत शिंदे गटातील मंत्र्यांनी खोचक टोला लगावला आहे.

Maharashtra Politics: मुंबईतील पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्बल ११० दिवसांच्या कोठडीनंतर जामिनावर मुक्तता करण्यात आली. यानंतर संजय राऊत पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत दिल्लीत गेले होते. तसेच ते लवकरच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच शिंदे गटातील आमदारांनी पुन्हा एकदा संजय राऊतांना टोला लगावला आहे. 

शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ज्वाजल्य अभिमान महाराष्ट्रातील जनतेला आहे. राज्यपाल महोदय हे सर्वांत वरिष्ठ पद आहे. त्यांनी विधाने करताना जपून केले पाहिजेत. चुकीने एखादे वाक्य निघत असेल तर त्याचे स्पष्टीकरण पूर्वीसुद्धा राज्यपाल कोश्यारी यांनी दिले आहे. यावेळीही ते स्पष्टीकरण देतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. 

आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहोत

प्रकाश आंबेडकर यांनी कुणासोबत जावे. हा त्यांचा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जपण्याच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी करावयाच्या होत्या. याबाबत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहोत. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे बाबासाहेब आंबेडकर यांचा राजकीय वारसा आहे. त्यामुळे त्यांना त्यासंदर्भात जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू. बाबासाहेबांचे विचार, त्यांच्या स्मृती जपण्याचा विषय असेल किंवा इतर सुविधा देण्याबाबचे विचार आहेत. त्याबाबत चांगलं सहकार्य आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकार्य आहे. शासन त्यांना नेहमी सहकार्य करत राहील, अशी ग्वाही दीपक केसरकर यांनी दिली. 

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा रेड्याचा उल्लेख केला. सरकार म्हणजे औरंगजेबाची औलाद आहे, असेही म्हटले. यासंदर्भात बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, संजय राऊत हे नुकतेच तुरुंगातून बाहेर पडले आहेत. तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांची भाषा बदलली होती. चांगले बोलत होते. आता पुन्हा ते का वाईट बोलायला लागले याचा विचार करावा लागेल. विकासाची भाषा बोलत होते. त्यांना कुणीतरी काहीतरी शिकवत असावे, असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDeepak Kesarkarदीपक केसरकर