शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “संजय राऊतांना नैतिकतेची जाणीव असेल तर आम्हाला आव्हाने देण्याऐवजी राजीनामा द्यावा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 13:39 IST

Maharashtra News: बाळासाहेबांच्या विचारापासून शिवसैनिकांना दूर नेण्यात संजय राऊतांचा मोठा वाटा आहे. ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली.

Maharashtra Politics: आताच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली, तर जनमताचा कौल कुणाच्या बाजूने असेल, याचा एक सर्व्हे घेण्यात आला. सीव्होटरने घेतलेल्या सर्व्हेमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी हा सर्व्हे विश्वासार्ह नसल्याचे म्हटले होते. यावरून संजय राऊतांनी टीका केली होती. या टीकेला टीकेला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांना नैतिकतेची थोडी जरी जाणीव असेल तर त्यांनी आम्हाला आव्हाने देण्याऐवजी राजीनामा द्यावा, असे शिंदे गटाने म्हटले आहे. 

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांच्या विचारापासून सर्व शिवसैनिकांना दूर नेण्याचा मोठा वाटा संजय राऊतांचा आहे. मुळात राऊत हे शिवसेनेचे नाही ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. कारण ते नेहमी राष्ट्रवादीचे गुणगान गात असतात. संजय राऊत यांनी शिवसेनेला हिंदुत्वाच्या विचारापासून लांब नेले. त्यांनी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधला, अशी घणाघाती टीका दीपक केसरकर यांनी केली. 

आम्हाला आव्हाने देण्याऐवजी राजीनामा द्यावा

दीपक केसरकर पुढे म्हणाले की, मूळातच ते आमच्या मतावर निवडून राज्यभेत गेलेले आहेत. थोडी जरी त्यांना नैतिकतेची जाणीव असेल, तर आम्हाला आव्हान देण्याऐवजी त्यांनी राज्यसभेच्या आपल्या जागेचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे. छोटीशीच तर निवडणूक असते, फक्त आमदाराच मतदान करणार आहेत, तेवढा तरी एकदा त्यांनी प्रयोग करून बघावा, असे आव्हान दीपक केसरकर यांनी दिले. तसेच पक्षाचे चिन्ह आपल्याच गटाला मिळणार असल्याचा दावा केसरकरांनी केला आहे. 

आमचाच विजय होईल, निकाल आमच्याच बाजूने लागेल

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत किती मतदान झाले हे पाहिले जाते. किती सदस्य निवडून आले हे पाहिले जाते. आमच्यासोबत ऐंशी ते नव्वद टक्के आमदार आणि खासदार आहेत. त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल. आमचाच विजय होईल, असा विश्वास दीपक केसरकरांनी व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले. त्या ठिकाणी संजय राऊत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होतात. काँग्रेससोबत हातमिळवणी करतात. हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अपमान आहे, या शब्दांत केसरकरांनी राऊतांवर हल्लाबोल केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Sanjay Rautसंजय राऊत