शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Maharashtra Political Crisis: वेदनादायी! घरात दुःखाचा डोंगर कोसळला; तरीही कर्तव्यनिष्ठा जपत दादा भुसेंची शपथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:17 IST

दादा भुसे कुटुंबियांच्या एका डोळ्यात दुःखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अखेर ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. नाशिकमधून शिंदे गटात सामील झालेले आमदार दादा भुसे (Dada Bhuse) यांची मंत्री मंडळात वर्णी लागली. या मंत्रिमंडळ विस्तारात तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. दादा भुसेंसह समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असताना एका बातमीने दादा भुसेंच्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणार्धात आनंदावर विरजण पडले.

नाशिकचे तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांना देखील कॅबिनेट पदी विराजमान होता येणार आहे. दादा भुसे मंत्रिपदाची शपथ घेत असताना घरात विवाहित पुतणीचे निधन झाल्याची वार्ता कळली. त्यानंतर दादा भुसेंसह परिवार शोकसागरात बुडाला.  शपथविधीच्या आदल्या दिवशी सायंकाळपर्यंत ते घरीच होते. रात्री उशिरा त्यांना मुंबईहून फोन आला. त्यांना तातडीने निघावे लागले. घरात अशी परिस्थिती असताना मनावर दगड ते मुंबईला शपथविधीसाठी पोहचले. 

भुसे कुटुंबियांच्या एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यांत आनंदाश्रू

आमदार दादा भुसे यांचे बंधू दत्तू भुसे यांची विवाहित मुलगी भाग्यश्री संदीप पाटील यांचे निधन झाले. याचवेळी दादा भुसे यांना मुंबई गाठावी लागली. दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे भुसे कुटुंबियांच्या एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. दादा भुसेंच्या मंत्रिपदाच्या आनंदाला दुःखाची किनार  होती. भुसे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर मालेगावी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. अनेकांनी ढोल ताशे, पेढे खाऊ घातले. 

दरम्यान, या मंत्रिमंडळात संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या शपथेवरून विरोधकांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली. मात्र, दोघांची निवड योग्य कशी योग्य आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ