शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 13:22 IST

एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरण समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून आहे असा आरोप संजय राऊतांनी केला.

नाशिक  - चित्र हळू हळू बदलतेय. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. २०२४ ची तयारी सुरू आहे. पण त्याआधीही परिवर्तन होऊ शकेल. जर आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही तर हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही हे माझे मत पक्के आहे. न्यायव्यवस्थेवर दबाव येईल वाटत नाही. संविधान, घटना आणि कायदा याचे उल्लंघन करणारे सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही असा दावा शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, १६ आमदार अपात्र ठरतील. केवळ वेळकाढूपणाचं धोरण स्वीकारलं आहे. सरकार व्हेटिंलेटरवर असून ते सर्वोच्च न्यायालयाने काढलं तर हे राम होईल. कुणी त्यांच्यासोबत राहणार नाही. आता हे सरकार कधी उलथवायचं आणि निवडणुकांना सामोरे जायचं याची प्रतिक्षा राज्यातील जनता करतेय. अधिवेशन काळात सरकारचा जो गोंधळ होता तो जवळून पाहता आला. रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येऊनही सरकार गेंड्याच्या कातडीप्रमाणे बसून होतं. या राज्यात सरकार अस्तित्वात नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत अनेक प्रकरण अधिवेशन काळात समोर येऊनही सरकार पाण्यात बसलेल्या म्हैशीसारखे जणू काही घडलेच नाही आणि विरोधी पक्षच जबाबदार आहे अशा पद्धतीने काम करते. पूर्वी हायकोर्टाने ताशेरे मारले तरी मंत्री राजीनामा द्यायचे. पण एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरण समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून आहे. ४० आमदारांसाठी हे सरकार आहे असा टोला संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. 

शिवसेना एकच, गट-तट तात्पुरतेदरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना. शिवसेना एकच आहे. गट-तट हे तात्पुरते आहे. शिवसेना एकच आहे. या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली. त्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतायेत. आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. शिवसेना हा महावृक्ष आहे. त्याचे बीज बाळासाहेबांनी रोवले. महावृक्ष फोफावतो, वाढतो. पाचोळा पडतो. कचरा पडतो तो कचरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वेचून नेला जातोय. त्यांच्यासमोर मुख्यमंत्री भाषण करतात. कचरा आग लावण्यासाठी असतो. या कचऱ्याचा धूर फार काळ राहत नाही असंही संजय राऊतांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस