शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

'कर्जमाफी'च्या निर्णयाची शेतकऱ्यांकडून 'होळी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 16:03 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी 2 लाखांपर्यंत कर्जाची रक्कम असेलेल्या शेतकऱ्यांच लाभ घेता येणार आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या या निर्णयावरून शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सरकारच्या निर्णयाची अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने होळी करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने कर्जमाफीची घोषणा सुद्धा केली. मात्र 2 लाखांपर्यंत कर्जाची रक्कम असलेल्या शेतकऱ्यांच या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याची अट सरकारने घातली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांनी निषेध केला आहे.

सरकारने कर्जमाफीसाठी निकष आणि अटी लावून गेल्यावेळच्या सरकारप्रमाणेचं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तर पूर्वीच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तर, या सरकारने महात्मा ज्योतिबा फुलेंचे नाव घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.

त्यामुळे पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाची होळी केली. सरकारने दिलेले आश्वासन पाळले नसून, आमची फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयात बदल करावा, अन्यथा सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी शेतकरी संघटनांनी दिला.