शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत शेळ्या-मेंढ्या घुसवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 15:04 IST

‘मला सत्तेत बसवा, मी संपूर्ण अभ्यास करून आलोय, मी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवीन’ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता..

ठळक मुद्देभाजपच्या महाजनादेश यात्रेत शेळ्या-मेंढ्या घुसविण्याचा इशारा

बारामती : भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा पुढील आठवड्यात बारामतीमध्ये येणार आहे. या यात्रेत मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. धनगर समाजाच्या मागण्या मान्य न झाल्याने भाजपच्या या महाजनादेश यात्रेत शेळ्या-मेंढ्या घुसविण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंबंधी बारामती येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन गुरुवारी (दि. २९)  देण्यात आले. यांच्या प्रति मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना पाठविल्या आहेत.२०१४ रोजी बारामती येथे धनगर समाजाचे ऐतिहासिक आंदोलन झाले होते. त्यावेळी धनगर समाजातील बांधव आमरण उपोषणाला बसले होते. त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाच्या मागणीचा विचार केला नाही. परंतु, तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर समाजाचे उपोषण सोडण्यासाठी बारामतीत आले. ‘मला सत्तेत बसवा, मी संपूर्ण  अभ्यास करून आलोय, मी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविन’ असा शब्द दिला. त्यानंतर फडणवीस यांच्या हस्ते उपोषण सोडले. पण, गेल्या पाच वर्षांत २४० मंत्रिमंडळ बैठका झाल्या; परंतु आरक्षणाचा कोणताही निर्णय झाला नाही. धनगर समाजाची फसवणूक करण्यात आल्यामुळे धनगर समाजामध्ये नाराजी आहे. आम्हाला योजनांची भीक नको, एस.टी.चे सर्टिफिकेट पाहिजे, एस.टी.च्या सर्व सवलती आपोआप मिळतील. त्यामुळे आरक्षण महत्त्वाचे आहे, तरी आपण महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने बारामती येथे येत आहोत, तरी आपण बारामतीत येत असताना तुमच्या पक्षातील भाजपच्या एखाद्या धनगर समाजातील पदाधिकाºयांचे एस.टी.चे सर्टिफिकेट आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे घेऊन नाही आला, तर आम्ही आपल्या महाजनादेश यात्रेत शेळ्या-मेंढ्या घुसवून निषेध आंदोलन करू, समाजाच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. बारामतीच्या भूमीत आम्हाला शब्द दिला होता म्हणून आम्हाला महाजनादेश यात्रेला विरोध करण्याचा अधिकार असल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Baramatiबारामतीreservationआरक्षणMahadev Jankarमहादेव जानकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्रा