शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“भारत हिंदू राष्ट्र होईल, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वप्न पूर्ण होईल”: शरद पोंक्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 15:57 IST

Veer Savarkar and Sharad Ponkshe: काँग्रेस सरकारच्या काळात सावरकरांची बदनामी करण्यात आली. मात्र, सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.

Veer Savarkar and Sharad Ponkshe: ज्येष्ठ मराठी अभिनेते स्पष्टपणे आपली मते मांडत असतात. सोशल मीडिया असो किंवा व्याख्यान असो, शरद पोंक्षे स्पष्ट भूमिका मांडताना दिसतात. अशातच स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत शरद पोंक्षे यांनी पुन्हा एकदा मत व्यक्त केले आहे. भारत हिंदू राष्ट्र होईल, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वप्न पूर्ण होईल, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे. 

५० वर्षांहून अधिक काळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांची खासकरून काँग्रेस सरकारच्या काळात बदनामी करण्यात आली. हिंदू धर्मावर आघात करण्याचे राजकारण सुरू आहे, म्हणून सावरकर डोळसपणे सातत्याने वाचले पाहिजेत. काँग्रेस सरकारच्या काळात सावरकरांची बदनामी करण्यात आली. मात्र, सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही. स्वातंत्र्यानंतरही सावरकरांचा सतत अपमान होत राहिला, अशी टीका शरद पोंक्षे यांनी केली. 

सतत सावरकर वाचत रहावे लागेल

एका व्याख्यानात बोलताना शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व हेच खरे राष्ट्रीयत्व होते, असे मनावर कोरले गेले पाहिजे. देश हिंदू राष्ट्र होईल, तेव्हाच सावरकरांचे स्वप्न पूर्ण होईल, केवळ दीड, दोन तासांत सावरकर कळणार नाहीत. त्यासाठी सतत सावरकर वाचत रहावे लागेल. केवळ व्याख्यान ऐकून उपयोग होणार नाही, तर सावरकरांच्या प्रखर विचारांचा घरोघरी प्रचार-प्रसार आवश्यक आहे, असे आवाहन शरद पोंक्षे यांनी केले. 

 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरSharad Ponksheशरद पोंक्षेCelebrityसेलिब्रिटी