शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
5
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
6
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
7
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
8
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
10
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
11
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
12
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
13
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
14
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
15
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
16
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
17
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
18
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
19
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
20
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

पवारांची खरी राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर; जयंत पाटलांचा अजित पवार गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 18:39 IST

शेतकरी प्रश्नावरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. तसंच अजित पवार गटावरही निशाणा साधला.

नाशिक : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने राज्यभर आक्रमक भूमिका घेतली असून 'शेतकरी आक्रोश मोर्चा'चं आयोजन करण्यात येत आहे. आज दिंडोरी येथील आक्रोश मोर्चातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. तसंच अजित पवार गटावरही जोरदार निशाणा साधला.

"आज आम्ही मोर्चा आणला, पण हा लढा इथेच थांबणार नाही. मी हा मुद्दा आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने येणाऱ्या हिवाळी अधिवेशनातही लावून धरणार. आपल्यातून तिकडे गेलेले पंचतारांकित हॉटेलमध्ये चिंतन करत आहेत. पण पवार साहेबांची खरी राष्ट्रवादी ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आहे," असा हल्लाबोल जयंत पाटलांनी केला आहे. तसंच "जर तुम्ही विकासासाठी तिकडे गेले असाल तर या शेतकऱ्यांच्या मागे उभे राहा. राज्याची तिजोरी तुमच्या हातात आहे. पीकविमा तुमच्या हातात आहे, शेती खाते तुमच्या हातात आहे. मग मुख्यमंत्र्यांना आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना विचारण्याची काय गरज?" असा सवालही जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला केला आहे.

सरकारवर टीका करताना काय म्हणाले जयंत पाटील?

शेतकरी प्रश्नावरून सरकारचा समाचार घेताना जयंत पाटील म्हणाले की, "शेतकरी दारात आल्याशिवाय त्याला काहीच द्यायचे नाही हे सरकारचे धोरण आहे. म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून सतत मागणी केल्यानंतर फक्त राज्यातील काही भागात या सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.आज सकाळी मी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत होतो. त्यावेळी शेतकरी कुऱ्हाडीने द्राक्षाची झाडे तोडत होता. तीन-साडे तीन लाख खर्च करून जर एक रुपयाही मिळणार नसेल तर काय फायदा, असे त्या शेतकऱ्याचे म्हणणे होते. ही या राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. या परिस्थितीत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे," अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

धनंजय मुंडेंना टोला

"कांदा उत्पादक शेतकरी या भागाचा महत्त्वाचा घटक आहे. पण याच कांद्यावर या सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. कांदा बाहेर पाठवता येत नाही आणि त्यामुळे कांदा इथेच सडतो. पीकविमा कंपन्या काही कारणे सांगून परतावा देत नाही. महाराष्ट्रात फसव्या पीकविम्याचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही ही आपल्या राज्यासाठी शोकांतिका आहे. कृषिमंत्री म्हणाले होते की, दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळेल. शेतकऱ्यांना पैसे नाही मिळाले तर दिवाळी साजरी करणार नाही. यांची दिवाळी जोरात झाली पण आमच्या बळीराजाला पैसे मिळाले नाही. त्यामुळे या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार