शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पवारांची खरी राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर; जयंत पाटलांचा अजित पवार गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 18:39 IST

शेतकरी प्रश्नावरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. तसंच अजित पवार गटावरही निशाणा साधला.

नाशिक : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने राज्यभर आक्रमक भूमिका घेतली असून 'शेतकरी आक्रोश मोर्चा'चं आयोजन करण्यात येत आहे. आज दिंडोरी येथील आक्रोश मोर्चातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. तसंच अजित पवार गटावरही जोरदार निशाणा साधला.

"आज आम्ही मोर्चा आणला, पण हा लढा इथेच थांबणार नाही. मी हा मुद्दा आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने येणाऱ्या हिवाळी अधिवेशनातही लावून धरणार. आपल्यातून तिकडे गेलेले पंचतारांकित हॉटेलमध्ये चिंतन करत आहेत. पण पवार साहेबांची खरी राष्ट्रवादी ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आहे," असा हल्लाबोल जयंत पाटलांनी केला आहे. तसंच "जर तुम्ही विकासासाठी तिकडे गेले असाल तर या शेतकऱ्यांच्या मागे उभे राहा. राज्याची तिजोरी तुमच्या हातात आहे. पीकविमा तुमच्या हातात आहे, शेती खाते तुमच्या हातात आहे. मग मुख्यमंत्र्यांना आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना विचारण्याची काय गरज?" असा सवालही जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला केला आहे.

सरकारवर टीका करताना काय म्हणाले जयंत पाटील?

शेतकरी प्रश्नावरून सरकारचा समाचार घेताना जयंत पाटील म्हणाले की, "शेतकरी दारात आल्याशिवाय त्याला काहीच द्यायचे नाही हे सरकारचे धोरण आहे. म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून सतत मागणी केल्यानंतर फक्त राज्यातील काही भागात या सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.आज सकाळी मी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत होतो. त्यावेळी शेतकरी कुऱ्हाडीने द्राक्षाची झाडे तोडत होता. तीन-साडे तीन लाख खर्च करून जर एक रुपयाही मिळणार नसेल तर काय फायदा, असे त्या शेतकऱ्याचे म्हणणे होते. ही या राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. या परिस्थितीत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे," अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

धनंजय मुंडेंना टोला

"कांदा उत्पादक शेतकरी या भागाचा महत्त्वाचा घटक आहे. पण याच कांद्यावर या सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. कांदा बाहेर पाठवता येत नाही आणि त्यामुळे कांदा इथेच सडतो. पीकविमा कंपन्या काही कारणे सांगून परतावा देत नाही. महाराष्ट्रात फसव्या पीकविम्याचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही ही आपल्या राज्यासाठी शोकांतिका आहे. कृषिमंत्री म्हणाले होते की, दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळेल. शेतकऱ्यांना पैसे नाही मिळाले तर दिवाळी साजरी करणार नाही. यांची दिवाळी जोरात झाली पण आमच्या बळीराजाला पैसे मिळाले नाही. त्यामुळे या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार