शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

‘राष्ट्रवादी’च्या संघटनात्मक पुनर्रचनेचे सूतोवाच, वंचितकडे गेलेले मतदार जोडणार 'पवार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 09:43 IST

पराभवाबाबत उमेदवारांनी केलेल्या विश्लेषणावर पवार म्हणाले की

मुंबई : पक्ष म्हणून काही ठिकाणी आपण कमी पडलो. त्याची किंमत निवडणुकीत मोजावी लागली. त्याचा विचार केला पाहिजे. संघटनात्मक काम कमी पडले. काही जिल्ह्यांत वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीकडे जबाबदारी आहे. तिथे नव्यांना संधी दिली पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील संघटनात्मक बदलांचे सुतोवाच केले. मुंबई, ठाण्यासारख्या जिल्ह्यात एखाद दुसऱ्या जागीच राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. अशा ठिकाणी जास्त लक्ष देण्याची आवश्यकताही पवार यांनी बोलून दाखविली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात विधानसभेतील पराभूत उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांची शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक झाली. विधानसभेचा निकाल संमिश्र लागला. तरूणांनी आणि अल्पसंख्याक समाज विशेषत: मुस्लिमांनी आपली शक्ती राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभी केली. काय वाटेल ते झाले तरी भाजप नको असे त्यांनी ठरवले होते. शिवाय शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला, असे सांगताना काही ठिकाणी मात्र आपण मागे पडलो, अशी स्पष्ट कबुलीही शरद पवार यांनी दिली. काही ठिकाणी आणखी काम करण्याची गरज आहे. हेलोकांनी लक्षात आणून दिल्याचे, ते म्हणाले.पराभवाबाबत उमेदवारांनी केलेल्या विश्लेषणावर पवार म्हणाले की, तुम्हाला यश आले नाही त्याची अनेक कारणे आहेत. दिल्लीत व राज्यात त्यांचे सरकार असल्यामुळे त्याचा पुरेपुर वापर सत्ताधाºयांनी केला. सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही, ही बाब समजू शकतो. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच काम न केल्याच्या तक्रारी काहींनी केल्या. माझ्याच पक्षातील कार्यकर्ता काम करत नाही. विरोधी काम करतो, त्यावेळी मी स्वत:चे काम तपासून घ्यायला हवे, असा सल्लाही पवार यांनी यावेळी उपस्थितांना दिला.पराभूत उमेदवारांकडे संबधित भागाची संघटनात्मक जबाबदारी सोपविली जाईल. त्यामाध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत त्यांनी पोहचायला हवे. पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी शक्ती उभी करणार आहे तुम्ही त्याचा वापर करून घ्या. महाराष्ट्रात तुम्हीच अग्रभागी आहे. हे लक्षात आणून देवू या, असे आवाहन त्यांनी केले.वंचितच्या माध्यमातून दलित संघटनच्वंचित बहुज आघाडीच्या माध्यमातून समाजातील गरीब वर्ग, दलित आणि मुस्लिम एकवटला. हा वर्ग लोकसभेत वंचितच्या पाठिशी राहिला. वंचितच्या पाठिशी असलेला मुस्लिम समाज विधानसभेत बाजुला झाला. तर नवबौद्ध आणि इतर वंचितच्यामागे उभा राहिला.च्वंचितला पाठिंबा देणारा दलित, नवबौद्ध हा वर्ग आपल्या बाजुला आहे की नाही, हे पाहिले नाही. त्यामुळेच त्याचा फटका बसला आहे. एससी व एसटी या समाजाच्या ठिकाणी संघटनात्मक काम करण्यात कमी पडलो. त्यांना पक्षात प्रतिष्ठा देतो आहे की नाही हेही पाहिले पाहिजे, असे पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी