शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सोशल मीडियात व्हायरल OBC दाखल्यावर शरद पवारांचा खुलासा; "जन्मानं माझी जात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 14:12 IST

मराठा समाजातील तरुणांची आरक्षणाची भावना तीव्र आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं पवारांनी म्हटलं.

पुणे – राज्यात सुरु असणाऱ्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांनी स्पष्टपणे भाष्य केले. त्याचसोबत पवारांचा ओबीसी जात प्रमाणपत्राचा दाखल सोशल मीडियात व्हायरल होतोय त्यावरही खुलासा केला. मी हा दाखला पाहिला, तो खरा असला तरी काही लोकांनी दुसरा दाखला फिरवला आहे. माझी जात कोणती हे सर्वांना माहिती आहे असं सांगत मी कधी जातीचं राजकारण केले नाही असं शरद पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

शरद पवार म्हणाले की, सोशल मीडियात व्हायरल होणारा माझा दाखला मी पाहिला, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूलमध्ये शिकायला होतो. तो दाखला आहे, त्या गोष्टी खऱ्या आहेत. पण काही लोकांनी दुसरा दाखला फिरवला. त्यात माझ्यापुढे ओबीसी लिहिलं. ओबीसी समाजाबद्दल माझ्या मनात आस्था आहे. पण जन्माने माझी जात कोणती हे सर्वांना माहिती आहे. परंतु जातीवरून मी राजकारण आणि समाजकारण कधी केले नाही, करणार नाही. पण हा वादग्रस्त मुद्दा सोडवण्यासाठी माझ्याकडून जो काही हातभार लावता येईल तो मी लावेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्याचसोबत मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्या बैठकीला मलाही आमंत्रण होते. त्यात राज्यातील विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या आहेत. त्याची पूर्तता आम्ही करतोय आणि त्यासंदर्भात सरकार पाऊले टाकतंय असं सांगितले. आता तो निर्णय त्यांच्याकडून लवकर आला तर वातावरण सुधारेल राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या अख्यातरित्या आरक्षण हा प्रश्न आहे. मराठा समाजातील तरुणांची आरक्षणाची भावना तीव्र आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण या निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारचा आहे. परंतु लोकांच्या भावना आमच्याकडून केंद्र आणि राज्याकडे मांडल्या जातील असं शरद पवारांनी सांगितले.

दरम्यान, ठाणे शहर, जिल्हा हा शिवसेनेचा गड अनेक वर्षापासून आहे. त्याठिकाणी शिवसेना संघटना मजबूत आहे. कार्यालये मजबूत आहे. दुर्दैवाने अनेक वर्षापासून त्यांची शाखा होती ती तोडली गेली. विशेषत: राज्याच्या प्रमुखांनाकडून सर्वांना बरोबर घेण्याची भूमिका असावी. परंतु अशाप्रकारे कार्यालये तोडणे, उद्ध्वस्त करणे ही भूमिका योग्य नाही. राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सर्वसामान्य लोकांना त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे हे महत्त्वाचे आहे. ओबीसी, मराठा यांचे प्रश्न सोडवण्याचं काम राज्य आणि केंद्र सरकारने करावे असं शरद पवारांनी सांगितले. तसेच राज्य सरकारने दुष्काळाबाबत जो निर्णय जाहीर केला, त्यात अनेक ठिकाणी जिथं पाणी नाही, पाऊस नाही अशा तालुक्यांचा समावेश नाही. आम्ही हा प्रश्न सातत्याने मांडला. त्यानंतर सरकारनं येत्या १-२ दिवसात या निर्णयात दुरुस्ती करू असं मान्य केले अशी माहिती त्यांनी दिली.   

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवारOBCअन्य मागासवर्गीय जातीEknath Shindeएकनाथ शिंदे