शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

Sharad Pawar Team India: "टीम इंडियासोबत मी जेव्हा Pakistan मध्ये गेलो त्यावेळी.."; शरद पवारांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 09:17 IST

पाकिस्तानात कशी लोकं भेटली, याबद्दल शरद पवारांनी आठवणी सांगितल्या

Sharad Pawar Team India: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय राजकीय संबंध सर्वश्रुत आहे. सीमेवरील वातावरण अतिशय तणावाचे असल्याचे दिसून येते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पाकिस्तान भेटीचा एक किस्सा सांगितला. जेव्हा शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष होते, तेव्हाची ही गोष्ट आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थित लोकांना संबोधित करताना त्यांनी आपल्या पाकिस्तान, विशेषतः कराची भेटीच्या जुन्या आठवणी सांगितल्या. ते टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत क्रिकेट मालिकेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला गेले होते.त्यावेळी ते पाकिस्तानी लोकांना कसे भेटले, त्यांच्यासोबतचे काय अनुभव होते, याबाबत शरद पवार यांनी सांगितले.

"मी एकदा एक गोष्ट बोललो होतो ज्यावरून मीडिया माझ्या मागे लागला. मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना एकदा भारत आणि पाकिस्तानचा सामना कराचीत होणार होता. खरे सांगायचे तर, त्यावेळी भारत सरकारकडून पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी कोणतीही परवानगी नव्हती. तेव्हा मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे विनंती केली. तरुणांना खेळण्याची संधी देण्याबाबत तो प्रस्ताव होता. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी परवानगी दिली," असे शरद पवार म्हणाले.

टीम इंडियाला कराची फिरायचं होतं तेव्हा...

शरद पवार पुढे म्हणाले, "तेव्हा खेळाडूंनी मला सांगितले- आम्हाला कराचीला जायचे आहे आणि फिरायचं आहे. आम्ही निघालो आणि एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. नाश्त्यानंतर आम्ही पैसे देण्यासाठी काउंटरवर पोहोचलो असता हॉटेल मालकाने पैसे घेणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की तुम्ही आमचे पाहुणे आहात. आम्ही त्याला पैसे घेण्याचा आग्रह करत राहिलो, पण त्याने आमचे काहीच ऐकले नाही. उलट तो म्हणाला की, टीव्हीवर दिसणारे खेळाडू कराचीला आले आहेत. यातच खूप काही मिळालं. आम्ही पाहुण्यांकडून पैसे घेत नाही. आम्ही खूप आग्रह केला पण त्याने शेवटपर्यंत पैसे घेतले नाहीत."

"क्रिकेटमुळे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेत दौऱ्यासाठी आम्हाला जायला लागायचे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील लोकही भारतात येण्यास उत्सुक असल्याचे आम्हाला आढळून आले. कारण त्यांचे काही नातेवाईक भारतात राहतात. सर्वसामान्यांच्या मनात भारताबद्दल द्वेष नाही. सर्वसामान्यांमध्ये एकमेकांबद्दल पुरेसे प्रेम आणि आदर आहे. राजकारणाशी संबंधित लोकांमध्ये मात्र द्वेष आणि दुरावा आहे. जगातील सर्व धर्माचे, सर्व भाषांचे लोक एकत्र आले पाहिजेत. एकात्मतेची भावना असली पाहिजे. पण धर्माच्या नावावर राजकारण करणारे लोक समाजात द्वेष पसरवत आहेत हे खेदजनक आहे," अशी खंतही शरद पवारांनी व्यक्त केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPakistanपाकिस्तानTeam Indiaभारतीय क्रिकेट संघBCCIबीसीसीआय