शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 23:16 IST

Sharad Pawar News: भारताच्या लोकसभा निवडणुकीवर अमेरिकेसह जगाचे लक्ष आहे, असे म्हणत एका आंतरराष्ट्रीय मीडियाचा प्रतिनिधी बारामतीत येऊन भेटल्याचा किस्सा शरद पवारांनी सांगितला.

Sharad Pawar News: गेली १० वर्ष या देशाची सत्ता नरेंद्र मोदी नावाच्या गृहस्थाच्या हातात गेली. सत्ता देशाची गेली, अपेक्षा अशी होती भाजपाचा प्रधानमंत्री यापूर्वी या देशाने बघितले होते. संसदेत विरोधी पक्ष नेता होतो, तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. अनेक प्रश्नांवर विरोधी पक्ष नेता आणि सत्ताधारी नेता यांना एकत्र बसावे लागते. काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्याच्यावर चर्चा करावी लागते आणि एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की, वाजपेयी यांनी त्या काळामध्ये कोणताही महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय किंवा देशाचा प्रश्न आला तर, आम्हा लोकांना ते बोलवत असत, चर्चा करत असत, म्हणणे ऐकून घेत असत आणि योग्य तो निर्णय घेत असत. आजचे प्रधानमंत्री यांचा संवादावर विश्वास नाही, कधी ते विरोधकांशी बोलत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केली. 

महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ साताऱ्याच्या दहिवडी येथे आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीवर देशाचेच नाही तर जगाचे लक्ष आहे. एका सभेत कोणीतरी न माहितीचे गृहस्थ दिसले. मी चौकशी केली, की हे कोण आहेत? तेव्हा मला सांगण्यात आले की, अमेरिकेत सर्वात महत्त्वाचे वर्तमानपत्र आहे, त्याचे नाव 'न्यूयॉर्क टाइम्स'. त्याचे प्रतिनिधी माहिती घेण्यासाठी आले होते. सभा संपल्यावर मी त्यांची चौकशी केली,  इतक्या लांब तुम्ही आले कसे? तर त्यांनी सांगितले की, भारताच्या निवडणुकीसंबंधी जगाचे लक्ष आहे, अमेरिकेचे लक्ष आहे. त्यातल्या त्यात ही निवडणूक संघर्षाची कुठे होत असेल तर ती महाराष्ट्रात होत आहे आणि म्हणून मला माझ्या कंपनीने महाराष्ट्रात जायला सांगितले म्हणून मी आलो, असा एक किस्सा शरद पवार यांनी सांगितला.

मनमोहन सिंग यांनी १११ पत्रकार परिषदा घेतल्या, मोदींनी एकही नाही

सरकारला साधारणपणे दर एक वर्ष झाल्यानंतर एक वर्षाच्या कारभाराच्या संबंधीचा आढावा पत्रकारांना बोलावून देण्याची पद्धत या देशामध्ये गेल्या अनेक वर्षांची आहे. डॉ. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांच्या १० वर्षांच्या काळामध्ये १११ वेळा त्यांनी पत्रकारांना निमंत्रण दिले आणि आपल्या कामाच्या संबंधीचा आढावा हा त्यांच्यासमोर घेतला. मोदींना प्रधानमंत्री होऊन १० वर्षे झाली. या १० वर्षांत आजपर्यंत एकदाही पत्रकार परिषद घेणे आणि आपल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडणे हे त्यांनी कधी केले नाही. कारण त्याच्यावर विश्वासच नाही, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला.

दरम्यान, आधीचे प्रधानमंत्री असे आहेत. मनमोहन सिंग यांच्यानंतर मोदी आले. महिनाभर पार्लमेंटचे अधिवेशन आले, तर आमच्या सभागृहामध्ये जास्तीत जास्त एक ते दीड तास, ३० दिवसातील एक ते दीड तास ते सभागृहात येणार, बसणार आणि त्यांचे काही विषय असणार तर बोलणार आणि नंतर निघून जाणार. याचा अर्थ या देशातील संसदीय लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वास नव्हता आणि नाही, असे शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारsatara-pcसाताराmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदी