शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 21:03 IST

Sharad Pawar Reaction On Emergency: आम्ही काय वाट्टेल ती किंमत देऊ, पण संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील, हा दृष्टीकोण पुढे घेऊन उभे राहू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar Reaction On Emergency: देशातील आणीबाणी लावल्याच्या घटनेला ५० वर्षे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा सर्व देशभरात या आणीबाणीला विरोध दर्शवत काँग्रेसवर जोरदार टीका करत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत आणीबाणीविरोधात प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणीबाणीवरून काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आणीबाणीवर मोठे विधान केले आहे. 

कामगार संघटनेच्या एका मेळाव्यात बोलत असताना शरद पवार यांनी आणीबाणीवर भाष्य केले. वृत्तपत्रात काम करतात, त्यांना माहिती असेल. बाकीच्यांना माहिती नाही. जे वृत्तपत्र त्यांचे मत स्वच्छ मांडत असेल आणि ते सरकारच्या विरोधी असेल तर त्या वृत्तपत्राला, त्या पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून फोन येतात. त्यांना सांगण्यात येते की, ही बातमी अशी छापू नका. सरकारविरोधी भूमिका घ्यायची असेल आणि बातमी लावायचीच असेल आणि नंतर काही झाले तर आमच्याकडे येऊ नका, अशी धमकी दिली जाते, असा दावा शरद पवार यांनी यावेळी बोलताना केला. 

घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे

अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी यातील काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते. पुन्हा सावध राहण्याचा काळ आला आहे. आम्ही काय वाट्टेल ती किंमत देऊ, पण संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील, हा दृष्टीकोण पुढे घेऊन उभे राहू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आणीबाणी होती. इंदिरा गांधी यांना दोष दिला. हे सर्व खरे आहे. पण पराभव झाल्यावर इंदिरा गांधी यांनी देशाची क्षमा मागितली, ही गोष्ट विसरता कामा नये. नंतरच्या काळात पुन्हा जनतेने त्यांना संधी दिली. चित्र बदलले होते, असे शरद पवार यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस