शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने साखर निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी हानीकारक: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 13:43 IST

सध्या साखरेचे प्रचंड उत्पादन झाले असून, शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र, केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

अहमदनगर: सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारचे हे धोरण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.

माजी केंद्रीय राज्यमंत्री तसेच महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष बबनराव ढाकणे यांच्या यांच्यावरील "विधिमंडळातील बबनराव ढाकणे" या ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. तसेच केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्यावेळी पवार बोलत होते. या कार्यक्रमास केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे,  माजी मंत्री बबनराव ढाकणे, आमदार निलेश लंके आमदार संग्राम जगताप,  माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे आदी यावेळी उपस्थित होते.

इथेनॉल सारखे पर्याय कारखान्यांना निवडावे लागणार आहेत

यावेळी शरद पवार पुढे म्हणाले की,  सध्या साखर एके साखर निर्माण करून चालणार नाही. इथेनॉल सारखे पर्याय कारखान्यांना निवडावे लागणार आहेत. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प निर्मितीचा प्रकल्प सुरू केला ही कौतुकाची बाब आहे. आयुष्यभर बबनराव ढाकणे यांनी जनतेची सेवा केली. सरपंच, सभापती, आमदार, खासदार, मंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.  सर्व पदं त्यांनी सांभाळली व जनतेला न्याय देण्याचे काम केले. अन्यायाच्या विरोधात लढा दिला. त्यांचा वारसा प्रतापराव पुढे चालवत आहेत. या दुष्काळी भागातील जनतेने विशेषत: तरुणांनी प्रतापराव ढाकणे यांच्या मागे ताकद उभी करावी, असे आवाहन केले.

दरम्यान,  यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितिन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीAhmednagarअहमदनगर