शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पवारांच्या 'या' दोन अटी अमान्य केल्याने सरकार स्थापण्याची भाजपची संधी हुकली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 12:59 IST

राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सरकारच्या मोबदल्यात कृषीमंत्रालय दिल्यास, बिहारमध्येही अशी मागणी होऊ शकते. बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांच्या जदयूमुळे सत्तेत आहे. नितीश यांच्याकडूनही रेल्वे मंत्रालयाची मागणी होऊ शकते. हे टाळण्यासाठी भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादीला सोबत घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या दोन अटी अमान्य केल्याने महाराष्ट्रात भाजपची सत्तास्थापनेची संधी हुकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत जाण्यास तयारी होता, मात्र त्यांच्या दोन अटी होत्या. त्यासाठी भाजप नेतृत्वाने नकार दिला असून सरकार स्थापन करणे शक्य झाले नसल्याचे वृत्त 'नवभारत टाईम्स' या हिंदी पोर्टलने दिले आहे. 

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आपल्या अटी सांगितल्या होत्या. यामध्ये केंद्रात सक्रिय असलेल्या आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रीय कृषीमंत्रीपद द्यावे आणि राज्यातील नेतृत्व बदलावे अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको, अशी मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्यांसाठी भाजपने नकार दिला. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सरकारच्या मोबदल्यात कृषीमंत्रालय दिल्यास, बिहारमध्येही अशी मागणी होऊ शकते. बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांच्या जदयूमुळे सत्तेत आहे. नितीश यांच्याकडूनही रेल्वे मंत्रालयाची मागणी होऊ शकते. हे टाळण्यासाठी भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादीला सोबत घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. 

राज्यात मागील पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांनी स्थिर सरकार चालवले होते. त्यामुळे नेतृत्व बदल करण्याच्या मूडमध्ये मोदी-शाह नव्हते. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल, असं म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीसांना बदलने शक्य नव्हते, असंही सुत्रांनी सांगितले.