शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

पवारांच्या 'या' दोन अटी अमान्य केल्याने सरकार स्थापण्याची भाजपची संधी हुकली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 12:59 IST

राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सरकारच्या मोबदल्यात कृषीमंत्रालय दिल्यास, बिहारमध्येही अशी मागणी होऊ शकते. बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांच्या जदयूमुळे सत्तेत आहे. नितीश यांच्याकडूनही रेल्वे मंत्रालयाची मागणी होऊ शकते. हे टाळण्यासाठी भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादीला सोबत घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या दोन अटी अमान्य केल्याने महाराष्ट्रात भाजपची सत्तास्थापनेची संधी हुकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत जाण्यास तयारी होता, मात्र त्यांच्या दोन अटी होत्या. त्यासाठी भाजप नेतृत्वाने नकार दिला असून सरकार स्थापन करणे शक्य झाले नसल्याचे वृत्त 'नवभारत टाईम्स' या हिंदी पोर्टलने दिले आहे. 

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आपल्या अटी सांगितल्या होत्या. यामध्ये केंद्रात सक्रिय असलेल्या आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रीय कृषीमंत्रीपद द्यावे आणि राज्यातील नेतृत्व बदलावे अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको, अशी मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्यांसाठी भाजपने नकार दिला. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सरकारच्या मोबदल्यात कृषीमंत्रालय दिल्यास, बिहारमध्येही अशी मागणी होऊ शकते. बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांच्या जदयूमुळे सत्तेत आहे. नितीश यांच्याकडूनही रेल्वे मंत्रालयाची मागणी होऊ शकते. हे टाळण्यासाठी भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादीला सोबत घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. 

राज्यात मागील पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांनी स्थिर सरकार चालवले होते. त्यामुळे नेतृत्व बदल करण्याच्या मूडमध्ये मोदी-शाह नव्हते. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल, असं म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीसांना बदलने शक्य नव्हते, असंही सुत्रांनी सांगितले.