शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

काँग्रेसच्या निर्णयाकडे राष्ट्रवादीचे लक्ष, शरद पवारांची भूमिका ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 05:40 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई : भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, काँग्रेसने अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, असे पवार यांनी सांगितले. राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत असताना खा. शरद पवार यांचे ‘सिल्व्हर ओक’ या घडामोडींचे निवासस्थान या घडामोडींचे केंद्र बनले आहे. रविवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी खा. पवार यांची भेट घेतली. उभयतांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना पटेल म्हणाले, आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने दिला आहे. शिवाय, सरकार स्थापन करण्याएवढे संख्याबळ नाही. मात्र, शिवसेनेला पाठिंबा देणार का, यावर त्यांनी ‘ब्र’ही उच्चारले नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या बाजुचे आहेत. मात्र काँग्रेसने पाठिंबा देण्यास नकार दिला तर त्यांची पंचाईत होऊ शकते. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात यावर बरेच काही अवलंबून आहे. यासंदर्भात शरद पवार हे सोनिया गांधी यांची परत भेट घेऊ शकतात, असे एका नेत्याने सांगितले. दरम्यान, राष्टÑवादी काँग्रेसच्या आमदारांची मंगळवारी बैठक आयोजित केली असून या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा आणि सत्तेत सहभागी होण्याबाबत निर्णय होणार असल्याचे समजते.>राष्ट्रवादीच्या त्याच अटीशिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील काँग्रेस प्रमाणेच अटी घातल्या आहेत. शिवसेनेने आधी केंद्र सरकार आणि एनडीएतून बाहेर पडावे. त्यानंतरच पाठिंब्याबाबत विचार करता येईल, असे मलिक यांनी सांगितले.>आम्हाला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिला आहे. आम्ही सध्या काहीही बोलणार नाही. आधी शिवसेनेने आम्हाला प्रस्ताव द्यावा लागेल. त्यातून काही सर्वसमावेशक व सर्वांना मान्य होईल असा कार्यक्रम तयार करावा लागेल. निवडणुका किंवा राष्टÑपती राजवट कोणालाही नको आहे. पण यावर आमचे नेते शरद पवार आपली भूमिका योग्यवेळी जाहीर करतील.- नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेस