शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: कार्यकर्ते भावूक, सहकारी आग्रही, शरद पवार विचार बदलणार? जयंत पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 12:45 IST

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार यांनी पद सोडू नये यासाठी कार्यकर्ते भावूक झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार यांनी पद सोडू नये यासाठी कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर पक्षातील सहकारी आणि नेतेही शरद पवार यांना पद न सोडण्याबाबत आग्रह करत आहेत. मात्र तरीही शरद पवार हे आपल्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.

शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा आणि पक्षातील घडामोडींबाबत प्रसारमाध्यमांनां माहिती देताना जयंत पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय नुकताच जाहीर केला होता आणि ते आपल्या निर्णयापासून ढळलेले नाहीत. त्यांची ही भूमिका अद्यापही कायम आहे. मात्र महाराष्ट्रातील विविध कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून,  हा निर्णय घेऊ नये, असा आग्रह केला आहे. देशातील अनेक राज्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेतेही त्यांना हेच सांगत आहेत. मात्र शरद पवार हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षाच्या कार्यकर्त्याची आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. तसेच त्यांची भूमिका काय आहे हे सांगण्याचं काम मी केलं आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी शरद पवार यांनी अध्यक्षपद सांभाळावे, अशी महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्यांची, तरुणांची भावना आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, याबबत विचारले असता ते म्हणाले की, सरोज पाटील यांनी अध्यक्षपदासाठी माझं नाव घेतलं असलं तरी मी महाराष्ट्रात काम करतो. महाराष्ट्र सोडून मला दिल्लीची माहिती नाही, माझ्या फारशा ओळखी नाहीत. दुसऱ्या राज्यांशी माझा फारसा संपर्क नाही. त्यामुळे दिल्लीत बसणाऱ्या, लोकसभेत किंवा राज्यसभेत काम करणाऱ्या, संसदेत बसून देश पाहणाऱ्या व्यक्तीने अशा जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. शरद पवार यांना तो अनुभव आहे. त्यामुळे ते यशस्वीपणे राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं काम करू शकले. आज अनेक वर्षांचा पवार यांचा अनुभव असल्याने लोकांची श्रद्धा विश्वास असल्याने अनेक राज्यातील लोक राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेले आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

आज शरद पवार हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सर्वच जण असं करणं योग्य नाही असं सांगताहेत. मात्र पक्ष पुढे नेण्यासाठी काही पावलं टाकली पाहिजेत, अशी शरद पवार यांची भूमिका दिसत आहे. मात्र मी प्रदेशाध्यक्ष असल्याने मला आणि माझ्या सहकाऱ्यांना २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची काळजी आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार यांनी अध्यक्षपदावर राहावं, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे शरद पवार हे तोपर्यंत अध्यक्ष राहिले तर ते पक्षातील सर्व घटकांना न्याय मिळवून देतील. तसेच ते या पदावर राहिल्यास आम्ही जर कुणावर अन्याय केल्यास कार्यकर्ते त्यांच्याकडे दाद मागू शकतील. न्याय देऊ शकतील, असेही जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस