शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

Sharad Pawar: कार्यकर्ते भावूक, सहकारी आग्रही, शरद पवार विचार बदलणार? जयंत पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 12:45 IST

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार यांनी पद सोडू नये यासाठी कार्यकर्ते भावूक झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार यांनी पद सोडू नये यासाठी कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर पक्षातील सहकारी आणि नेतेही शरद पवार यांना पद न सोडण्याबाबत आग्रह करत आहेत. मात्र तरीही शरद पवार हे आपल्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.

शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा आणि पक्षातील घडामोडींबाबत प्रसारमाध्यमांनां माहिती देताना जयंत पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय नुकताच जाहीर केला होता आणि ते आपल्या निर्णयापासून ढळलेले नाहीत. त्यांची ही भूमिका अद्यापही कायम आहे. मात्र महाराष्ट्रातील विविध कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून,  हा निर्णय घेऊ नये, असा आग्रह केला आहे. देशातील अनेक राज्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेतेही त्यांना हेच सांगत आहेत. मात्र शरद पवार हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षाच्या कार्यकर्त्याची आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. तसेच त्यांची भूमिका काय आहे हे सांगण्याचं काम मी केलं आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी शरद पवार यांनी अध्यक्षपद सांभाळावे, अशी महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्यांची, तरुणांची भावना आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, याबबत विचारले असता ते म्हणाले की, सरोज पाटील यांनी अध्यक्षपदासाठी माझं नाव घेतलं असलं तरी मी महाराष्ट्रात काम करतो. महाराष्ट्र सोडून मला दिल्लीची माहिती नाही, माझ्या फारशा ओळखी नाहीत. दुसऱ्या राज्यांशी माझा फारसा संपर्क नाही. त्यामुळे दिल्लीत बसणाऱ्या, लोकसभेत किंवा राज्यसभेत काम करणाऱ्या, संसदेत बसून देश पाहणाऱ्या व्यक्तीने अशा जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. शरद पवार यांना तो अनुभव आहे. त्यामुळे ते यशस्वीपणे राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं काम करू शकले. आज अनेक वर्षांचा पवार यांचा अनुभव असल्याने लोकांची श्रद्धा विश्वास असल्याने अनेक राज्यातील लोक राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेले आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

आज शरद पवार हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सर्वच जण असं करणं योग्य नाही असं सांगताहेत. मात्र पक्ष पुढे नेण्यासाठी काही पावलं टाकली पाहिजेत, अशी शरद पवार यांची भूमिका दिसत आहे. मात्र मी प्रदेशाध्यक्ष असल्याने मला आणि माझ्या सहकाऱ्यांना २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची काळजी आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार यांनी अध्यक्षपदावर राहावं, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे शरद पवार हे तोपर्यंत अध्यक्ष राहिले तर ते पक्षातील सर्व घटकांना न्याय मिळवून देतील. तसेच ते या पदावर राहिल्यास आम्ही जर कुणावर अन्याय केल्यास कार्यकर्ते त्यांच्याकडे दाद मागू शकतील. न्याय देऊ शकतील, असेही जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस