शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

Karnataka Maharashtra Border Dispute: "सीमेपलीकडून हल्ले अन् शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय देतंय", NCPचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 12:04 IST

"मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय का?", जयंत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया

BJP vs NCP Karnataka Maharashtra Border Dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांतील सीमाप्रश्न काहीसा नाजुक वळणावर आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा सांगितला होता. त्यानंतर, महाराष्ट्रातील एकही गाव राज्याबाहेर जाऊ देणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावले होते. तरीही हा वाद काही केल्या शमण्याचे नाव घेत नाहीये. बेळगावात कन्नडी गुंडांनी महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. त्या हल्ल्याच्या निषेध नोंदवत महाराष्ट्रातील कर्नाटकच्या बसेस वर 'जय महाराष्ट्र' लिहण्यात आले. असा सारा गोंधळ उडालेला असताना, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारवर एक गंभीर आरोप करत शेलक्या शब्दांत टीकादेखील केली आहे.

"सीमा भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहे,याबाबत जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्यावतीने १७ डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे या सर्वावर विचार राष्ट्रवादीच्या  बैठकीत केला जाणार आहेत. पण गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात वाद सुरू आहेत, तिथले मुख्यमंत्री आपल्या राज्याबद्दल अनुउद्गार काढतात, इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली जात आहेत अशामध्ये राज्य सरकारमार्फत कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय दिले जात आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेवून काम करत असतील तर हे दुर्दैवी आहे. सरकारच्या विद्वत्तेचे कौतुक करावे तितके कमी आहे," अशा खोचक शब्दांत जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

राष्ट्रवादी सीमावादाच्या प्रश्नावर आक्रमक

सीमावादाच्या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने आता 'आरे ला कारे' ने उत्तर दिले पाहिजे. तर छगन भुजबळ यांनी तर थेट कर्नाटक सरकारलाच इशारा दिला. "जर कर्नाटकाने गुंडगिरी थांबवली नाही तर पुन्हा एकदा गनिमी कावा दाखवावा लागेल. इतर गावांची मागणी करणाऱ्या कर्नाटकने अगोदर महाराष्ट्राची बेळगाव, कारवार, बीदर, भालकी इत्यादी गावे  महाराष्ट्राला द्या आणि नंतर कांगावा करा. ही दादागिरी आणि गुंडगिरी महाराष्ट्र खपवून घेणार नाही. मराठी माणसाला त्याचे उत्तर देता येत नाही असे नाही, पण महाराष्ट्राच्या संयमाचा अंत कर्नाटकने पाहू नये. बेळगावसह कर्नाटकातील मराठी माणसांसोबत आम्ही नेहमीच आहोत," असे भुजबळ म्हणाले.

टॅग्स :border disputeसीमा वादMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकJayant Patilजयंत पाटील