शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे म्होरके, उद्धव ठाकरे हे 'औरंगजेब फॅन क्लब'चे नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 05:22 IST

भाजप प्रदेश कार्यकारिणी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घणाघाती टीका

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : 'भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे म्होरके शरद पवार असून, त्यांचा खोटेपणा आता चालणार नाही. शरद पवारांचे केंद्रात, राज्यात दहा वर्षे सरकार होते, तेव्हा त्यांनी काय केले, असा सवाल उपस्थित करतानाच कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांना उद्धव ठाकरे साथ देत आहेत. महाविकास आघाडी म्हणजे 'औरंगजेब फॅन क्लब' असून उद्धव ठाकरे हे त्या क्लबचे नेते असल्याची घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी येथे केली.

भाजप प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन बालेवाडीत पार पडले. त्यात शाह यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, सरचिटणीस विनोद तावडे, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, पीयूष गोयल, आशिष शेलार, अश्विनी वैष्णव, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

केंद्राने दहा वर्षांत महाराष्ट्राला ४ लाख कोटी दिलेअमित शाह म्हणाले, आम्ही कामे केली. त्याचा हिशेब आमच्याकडे आहे. शरद पवारांचे केंद्रात, राज्यात दहा वर्षे सरकार होते, तेव्हा काय केले? केंद्रातील भाजप सरकारने दहा वर्षांत १० हजार ५ कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत. रस्त्यांसाठी ७५ हजार कोटी, रेल्वे मार्गासाठी २ लाख कोटी दिले. ३१ लाख कोटी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी दिले. पालखी मार्गासाठी ११ हजार कोटी दिले. ही सर्व कामे आम्ही केली. पवारांनी कसला विकास केला? पवार यांनी त्यांची कामे दाखवावी.

...तर मराठा आरक्षण पुन्हा गायब होईलमी पुण्यात आलोय. शरद पवार यांना विचारतो, की त्यांनी दहा वर्षे कृषिमंत्री असताना काय केले? त्यांनी मराठा आरक्षण का नाही दिले? राहुलबाबा हे खटाखट पैसे देणार होते, त्याचे काय झाले? भाजप आरक्षणाला पाठिंबा देत आहे. पवार अडचणी निर्माण करताहेत.

जेव्हा महाराष्ट्रात भाजप सरकार येते, तेव्हा मराठा आरक्षण मिळते आणि शरद पवारांचे सरकार येते तेव्हा का जाते? २०१९ पर्यंत भाजपने आरक्षण टिकवले होते. त्यानंतर शरद पवारांचे सरकार आले व आरक्षण गायब झाले. आता भविष्यात शरद पवारांचे सरकार आले, तर आरक्षण गायब होईल, असेही शाह म्हणाले.मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. आमची तीच भूमिका आहे.

अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी लढाई सुरु केली. त्यांचा बळी गेला; पण तेव्हा आरक्षण दिले गेले नाही. आपले सरकार आले आणि आरक्षण दिले. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी का आरक्षण दिले नाही? त्यांनी सांगितले की, मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. ते आता मतांसाठी दुफळी निर्माण करीत आहेत.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

हे देशाला काय सुरक्षित करणार?■ देश सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिले आहे. येत्या दोन वर्षांत देश नक्षलवादापासून मुक्त करू. दहशतवाद मुळापासून काढू. देशाच्या सुरक्षेसाठी औरंगजेब फॅन क्लब काहीच करू शकत नाही.■ महाविकास आघाडीवाले म्हणजे फॅन क्लब आहेत. त्यांचे नेते उद्धव ठाकरे आहेत. कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांसोबत ते बसत आहेत. लाज वाटली पाहिजे त्यांना. हे देशाला काय सुरक्षित करू शकतील, असा घणाघात शाह यांनी ठाकरेंवर केला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा