शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

शरद पवार समोर बसलेत, अन निवडणूक आयोगाला प्रश्न पडलाय पक्ष कोणाचा; राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 12:42 IST

सगळे भाजपाचे मंत्री वाऱ्यावरची वरात करत आहेत, त्या वरातीतल्या घोड्याला आपला निकाल लागल्यावर कळेल की तो किती मागे पडला आहे. - संजय राऊत

निवडणूक आयोगासमोर दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुरू आहेत. शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कुणाची हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे पक्ष आहेत. सुनावणीच्या वेळेला शरद पवार हे समोर बसलेले आहेत तरीही इलेक्शन कमिशनला प्रश्न पडतो की पक्ष कोणाचा, हे आश्चर्य आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

बोगस प्रतिज्ञा पत्रांचा विषय शिवसेनेत देखील निर्माण झालेला होता. ज्यांनी बेईमानी केली होती त्यांनी फक्त आमदार पळवले, पक्ष नाही. पक्षावर ताबा मिळविण्यासाठी त्यावेळी त्यांनी बोगस सर्टिफिकेट दिलेले होते. पण इलेक्शन कमिशनने त्याचा संदर्भ घेतला नाही आणि एकतर्फी निर्णय घेतला. आज राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील तोच प्रश्न उपस्थित होतोय. देशाचं दुर्दैव आहे की, इलेक्शन कमिशनला कळत नाही की या पक्षाची मालकी नेतृत्व कोणाकडे आहे. पाकिस्तानला माहित आहे की शिवसेना ठाकरेंची आहे, पण इलेक्शन कमिशनला माहित नाही, असा टोला राऊतांनी लगावला.

पुर्वीच्या काळी अशा टोळ्या होत्या, जे कबिल्यांचा ताबा घ्यायच्या आणि लुटमार करायच्या आणि अशा टोळ्या राजकारणात भाजपने निर्माण केल्या आहेत आणि पक्षांचा ताबा घेतला जातोय. घटनात्मक संरक्षण त्यांना दिले जातेय हे दुर्दैव आहे. इलेक्शन कमिशनने काहीही निर्णय घेऊद्या, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि पुढे देखील राहील, इलेक्शन कमिशन हे घटनात्मक संस्था आहे पण सध्या पिंजऱ्यातला पोपट झालेला आहे आणि पिसे देखील जळून गेलेली आहेत, नुसता फडफडतो, असा टोला राऊतांनी लगावला.

जो निकाल 2024 झाली महाराष्ट्रात लागणार आहे, तोच पाच राज्यांत लागणार. यांना महाराष्ट्रात कोणी विचारत नाही आणि हेच नेते तिकडे जाऊन प्रचार करत आहेत. मध्य प्रदेशमध्ये भाजपचा पराभव होतोय. महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून ज्या पद्धतीने आपले सगळे भाजपाचे मंत्री वाऱ्यावरची वरात करत आहेत, त्या वरातीतल्या घोड्याला आपला निकाल लागल्यावर कळेल की तो किती मागे पडला आहे. उगाच घोडे कशाला नाचवत आहात, असा सवालही राऊत यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग