शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शरद पवार समोर बसलेत, अन निवडणूक आयोगाला प्रश्न पडलाय पक्ष कोणाचा; राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 12:42 IST

सगळे भाजपाचे मंत्री वाऱ्यावरची वरात करत आहेत, त्या वरातीतल्या घोड्याला आपला निकाल लागल्यावर कळेल की तो किती मागे पडला आहे. - संजय राऊत

निवडणूक आयोगासमोर दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुरू आहेत. शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कुणाची हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे पक्ष आहेत. सुनावणीच्या वेळेला शरद पवार हे समोर बसलेले आहेत तरीही इलेक्शन कमिशनला प्रश्न पडतो की पक्ष कोणाचा, हे आश्चर्य आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

बोगस प्रतिज्ञा पत्रांचा विषय शिवसेनेत देखील निर्माण झालेला होता. ज्यांनी बेईमानी केली होती त्यांनी फक्त आमदार पळवले, पक्ष नाही. पक्षावर ताबा मिळविण्यासाठी त्यावेळी त्यांनी बोगस सर्टिफिकेट दिलेले होते. पण इलेक्शन कमिशनने त्याचा संदर्भ घेतला नाही आणि एकतर्फी निर्णय घेतला. आज राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील तोच प्रश्न उपस्थित होतोय. देशाचं दुर्दैव आहे की, इलेक्शन कमिशनला कळत नाही की या पक्षाची मालकी नेतृत्व कोणाकडे आहे. पाकिस्तानला माहित आहे की शिवसेना ठाकरेंची आहे, पण इलेक्शन कमिशनला माहित नाही, असा टोला राऊतांनी लगावला.

पुर्वीच्या काळी अशा टोळ्या होत्या, जे कबिल्यांचा ताबा घ्यायच्या आणि लुटमार करायच्या आणि अशा टोळ्या राजकारणात भाजपने निर्माण केल्या आहेत आणि पक्षांचा ताबा घेतला जातोय. घटनात्मक संरक्षण त्यांना दिले जातेय हे दुर्दैव आहे. इलेक्शन कमिशनने काहीही निर्णय घेऊद्या, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि पुढे देखील राहील, इलेक्शन कमिशन हे घटनात्मक संस्था आहे पण सध्या पिंजऱ्यातला पोपट झालेला आहे आणि पिसे देखील जळून गेलेली आहेत, नुसता फडफडतो, असा टोला राऊतांनी लगावला.

जो निकाल 2024 झाली महाराष्ट्रात लागणार आहे, तोच पाच राज्यांत लागणार. यांना महाराष्ट्रात कोणी विचारत नाही आणि हेच नेते तिकडे जाऊन प्रचार करत आहेत. मध्य प्रदेशमध्ये भाजपचा पराभव होतोय. महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून ज्या पद्धतीने आपले सगळे भाजपाचे मंत्री वाऱ्यावरची वरात करत आहेत, त्या वरातीतल्या घोड्याला आपला निकाल लागल्यावर कळेल की तो किती मागे पडला आहे. उगाच घोडे कशाला नाचवत आहात, असा सवालही राऊत यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग