शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

पवारांचे पुतणे आहेत, असू शकतात, मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचे; संजय राऊतांचा परखड सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 12:12 IST

आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा मागावा अशी ही  घटना आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. या राज्याचा कारभार वेड्या लोकांच्या हातात आहे, असे राऊत म्हणाले. 

महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यापासून मृत्युचं तांडव सुरु आहे. मृतांच्या कुटुबियांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचू शकला नाही, ते महाबळेश्वरला आरामासाठी गेलेत. ठाण्यात एवढे होऊन सुद्धा मुख्यमंत्री पोहोचले नाहीत, हे दुर्दैवी आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

त्यांचे जे पोपटलाल आहेत ते घोटाळे काढत बसले आहेत. त्यांनी कळव्यातल्या 18 लोकांबाबत संवेदना सुद्धा काढली नाही. भाजपने प्रश्न विचारला आहे का? लोकप्रतिनिधींचे राज्य नाहीय. जर  लोकप्रतिनिधींचे राज्य असते तर मृत्यूचे राज्य टाळले गेले असते. ठाणे मुंबईमध्ये लोकप्रतिनिधित्व नाही आहे, त्यामुळे लोकांना मरणाला सामोरे जावे लागत आहे, अशी टीका राऊत यांनी शिवसेना शिंदे गट-भाजपवर केली. 

आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा मागावा अशी ही  घटना आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. या राज्याचा कारभार वेड्या लोकांच्या हातात आहे, असे राऊत म्हणाले. 

परवा ज्या दोन नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाली, त्यावर काल आम्ही, नाना पटोले यांच्यात बैठक झाली. यामध्ये यावर चर्चा झाली. ते त्यांचे पुतणे आहेत, असू शकतात. मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचे, असा सवाल राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर व्यक्त केला आहे. आम्ही लोकांनी त्यांच्यासोबत बसायचे, नातीगोती सांभाळायची आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात लढायचं अशा प्रकारचे ढोंग शिवसेनेच्या डीएनएमध्ये नाही. लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम होईल अशा लोकांच्या मनात भीष्मपितामहामुळे निर्माण होणं हे मान्य नाही . शरद पवार हे महाराष्ट्राचे इंडिया आघाडीचे नेते आहेत त्यांचा संवादाचा स्वभाव आहे. राज ठाकरेंबरोबर देखील आमचा दोस्ताना होता, पण आमचे मार्ग वेगळे आहेत, लोकांच्या मनात संभ्रम येईल असं नेत्यांनी वागू नये , असे राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार