शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पवारांचे पुतणे आहेत, असू शकतात, मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचे; संजय राऊतांचा परखड सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 12:12 IST

आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा मागावा अशी ही  घटना आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. या राज्याचा कारभार वेड्या लोकांच्या हातात आहे, असे राऊत म्हणाले. 

महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यापासून मृत्युचं तांडव सुरु आहे. मृतांच्या कुटुबियांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचू शकला नाही, ते महाबळेश्वरला आरामासाठी गेलेत. ठाण्यात एवढे होऊन सुद्धा मुख्यमंत्री पोहोचले नाहीत, हे दुर्दैवी आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

त्यांचे जे पोपटलाल आहेत ते घोटाळे काढत बसले आहेत. त्यांनी कळव्यातल्या 18 लोकांबाबत संवेदना सुद्धा काढली नाही. भाजपने प्रश्न विचारला आहे का? लोकप्रतिनिधींचे राज्य नाहीय. जर  लोकप्रतिनिधींचे राज्य असते तर मृत्यूचे राज्य टाळले गेले असते. ठाणे मुंबईमध्ये लोकप्रतिनिधित्व नाही आहे, त्यामुळे लोकांना मरणाला सामोरे जावे लागत आहे, अशी टीका राऊत यांनी शिवसेना शिंदे गट-भाजपवर केली. 

आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा मागावा अशी ही  घटना आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. या राज्याचा कारभार वेड्या लोकांच्या हातात आहे, असे राऊत म्हणाले. 

परवा ज्या दोन नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाली, त्यावर काल आम्ही, नाना पटोले यांच्यात बैठक झाली. यामध्ये यावर चर्चा झाली. ते त्यांचे पुतणे आहेत, असू शकतात. मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचे, असा सवाल राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर व्यक्त केला आहे. आम्ही लोकांनी त्यांच्यासोबत बसायचे, नातीगोती सांभाळायची आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात लढायचं अशा प्रकारचे ढोंग शिवसेनेच्या डीएनएमध्ये नाही. लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम होईल अशा लोकांच्या मनात भीष्मपितामहामुळे निर्माण होणं हे मान्य नाही . शरद पवार हे महाराष्ट्राचे इंडिया आघाडीचे नेते आहेत त्यांचा संवादाचा स्वभाव आहे. राज ठाकरेंबरोबर देखील आमचा दोस्ताना होता, पण आमचे मार्ग वेगळे आहेत, लोकांच्या मनात संभ्रम येईल असं नेत्यांनी वागू नये , असे राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार