शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एकदा सामुदायिक शक्ती एकवटली तर...; शरद पवारांचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:56 IST

देशाचे पंतप्रधान घरे जाळल्यानंतर, महिलांची धिंड काढल्यानंतर समाजाला दिशा देण्याची आवश्यकता होती. पण मणिपूरकडे ढुंकण बघितले नाही असा आरोप शरद पवारांनी केला.

बीड - सत्ता दिलेले घटक योग्यरितीने वागत नाहीत. कुठेही काहीही घडते. आता वेळ आलीय, चुकीच्या लोकांना रोखण्याची, सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात डांबण्याचे कुणी राजकारण करत असेल, एकदा सामुहिक शक्ती एकवटली तर असं राजकारण करणाऱ्यांची सत्ता उलथवून टाकायला वेळ लागणार नाही असा घणाघात शरद पवारांनीभाजपा सरकारवर केला आहे.

शरद पवार म्हणाले की, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. मणिपूर हा देशाच्या उत्तरेकडील भाग. मणिपूर, नागालँड, सिक्किम, अरुणाचल ही छोटी छोटी राज्ये परंतु महत्त्वाची आहे. या राज्याच्या शेजारी पाकिस्तान, चीन आहे. या दोन्ही देशांची नजर भारताकडे चांगली नाही. त्यामुळे सतर्क राहण्याचे काम भारतीय सैन्याला करावे लागते. मणिपूरमध्ये चिंताजनक स्थिती आहे. दोन समाजात तणावाची परिस्थिती आहे. घरे जाळली जातायेत, स्त्रियांची धिंड काढली जातेय आणि हे सगळे होत असतानाही भाजपा सरकार कुठलेही पाऊले टाकत नाहीत. देशाचे पंतप्रधान घरे जाळल्यानंतर, महिलांची धिंड काढल्यानंतर समाजाला दिशा देण्याची आवश्यकता होती. पण मणिपूरकडे ढुंकण बघितले नाही. देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूरचे दु:ख समजून घेतले नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच मागच्या निवडणुकीत लोकांनी भाजपाचा पराभव करून तुम्ही निवडून आला. परंतु आज तुम्ही भाजपाच्या दावणीला जाऊन बसता. परंतु जेव्हा लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल तेव्हा लोकांना कोणते बटण दाबायचे आणि तुम्हाला कुठे पाठवायचे हे ठरवले आहे. त्यामुळे अधिक बोलायची गरज नाही. मी पुन्हा येईन असं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, त्यांनी मी पुन्हा येईन म्हटलं होते. पंतप्रधानांना सल्ला आहे. मी पुन्हा येईल विधान करताना देवेंद्र फडणवीसांचा सल्ला मार्गदर्शन घ्या, आज आहे त्या पदाच्या खाली आले असंही शरद पवारांनी मोदींवर टीका केली.

दरम्यान, लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्याचे काम भाजपाने केले. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा इथली सरकारे पाडण्यात आली. तुम्ही स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि केंद्राची सत्ता वापरून लोकांनी निवडलेली सरकारे पाडता. ही सगळी आव्हाने आपल्यासमोर आहेत असं शरद पवारांनी सभेत म्हटलं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा