शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

एकदा सामुदायिक शक्ती एकवटली तर...; शरद पवारांचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:56 IST

देशाचे पंतप्रधान घरे जाळल्यानंतर, महिलांची धिंड काढल्यानंतर समाजाला दिशा देण्याची आवश्यकता होती. पण मणिपूरकडे ढुंकण बघितले नाही असा आरोप शरद पवारांनी केला.

बीड - सत्ता दिलेले घटक योग्यरितीने वागत नाहीत. कुठेही काहीही घडते. आता वेळ आलीय, चुकीच्या लोकांना रोखण्याची, सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात डांबण्याचे कुणी राजकारण करत असेल, एकदा सामुहिक शक्ती एकवटली तर असं राजकारण करणाऱ्यांची सत्ता उलथवून टाकायला वेळ लागणार नाही असा घणाघात शरद पवारांनीभाजपा सरकारवर केला आहे.

शरद पवार म्हणाले की, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. मणिपूर हा देशाच्या उत्तरेकडील भाग. मणिपूर, नागालँड, सिक्किम, अरुणाचल ही छोटी छोटी राज्ये परंतु महत्त्वाची आहे. या राज्याच्या शेजारी पाकिस्तान, चीन आहे. या दोन्ही देशांची नजर भारताकडे चांगली नाही. त्यामुळे सतर्क राहण्याचे काम भारतीय सैन्याला करावे लागते. मणिपूरमध्ये चिंताजनक स्थिती आहे. दोन समाजात तणावाची परिस्थिती आहे. घरे जाळली जातायेत, स्त्रियांची धिंड काढली जातेय आणि हे सगळे होत असतानाही भाजपा सरकार कुठलेही पाऊले टाकत नाहीत. देशाचे पंतप्रधान घरे जाळल्यानंतर, महिलांची धिंड काढल्यानंतर समाजाला दिशा देण्याची आवश्यकता होती. पण मणिपूरकडे ढुंकण बघितले नाही. देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूरचे दु:ख समजून घेतले नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच मागच्या निवडणुकीत लोकांनी भाजपाचा पराभव करून तुम्ही निवडून आला. परंतु आज तुम्ही भाजपाच्या दावणीला जाऊन बसता. परंतु जेव्हा लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल तेव्हा लोकांना कोणते बटण दाबायचे आणि तुम्हाला कुठे पाठवायचे हे ठरवले आहे. त्यामुळे अधिक बोलायची गरज नाही. मी पुन्हा येईन असं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, त्यांनी मी पुन्हा येईन म्हटलं होते. पंतप्रधानांना सल्ला आहे. मी पुन्हा येईल विधान करताना देवेंद्र फडणवीसांचा सल्ला मार्गदर्शन घ्या, आज आहे त्या पदाच्या खाली आले असंही शरद पवारांनी मोदींवर टीका केली.

दरम्यान, लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्याचे काम भाजपाने केले. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा इथली सरकारे पाडण्यात आली. तुम्ही स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि केंद्राची सत्ता वापरून लोकांनी निवडलेली सरकारे पाडता. ही सगळी आव्हाने आपल्यासमोर आहेत असं शरद पवारांनी सभेत म्हटलं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा