शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

एकदा सामुदायिक शक्ती एकवटली तर...; शरद पवारांचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:56 IST

देशाचे पंतप्रधान घरे जाळल्यानंतर, महिलांची धिंड काढल्यानंतर समाजाला दिशा देण्याची आवश्यकता होती. पण मणिपूरकडे ढुंकण बघितले नाही असा आरोप शरद पवारांनी केला.

बीड - सत्ता दिलेले घटक योग्यरितीने वागत नाहीत. कुठेही काहीही घडते. आता वेळ आलीय, चुकीच्या लोकांना रोखण्याची, सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात डांबण्याचे कुणी राजकारण करत असेल, एकदा सामुहिक शक्ती एकवटली तर असं राजकारण करणाऱ्यांची सत्ता उलथवून टाकायला वेळ लागणार नाही असा घणाघात शरद पवारांनीभाजपा सरकारवर केला आहे.

शरद पवार म्हणाले की, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. मणिपूर हा देशाच्या उत्तरेकडील भाग. मणिपूर, नागालँड, सिक्किम, अरुणाचल ही छोटी छोटी राज्ये परंतु महत्त्वाची आहे. या राज्याच्या शेजारी पाकिस्तान, चीन आहे. या दोन्ही देशांची नजर भारताकडे चांगली नाही. त्यामुळे सतर्क राहण्याचे काम भारतीय सैन्याला करावे लागते. मणिपूरमध्ये चिंताजनक स्थिती आहे. दोन समाजात तणावाची परिस्थिती आहे. घरे जाळली जातायेत, स्त्रियांची धिंड काढली जातेय आणि हे सगळे होत असतानाही भाजपा सरकार कुठलेही पाऊले टाकत नाहीत. देशाचे पंतप्रधान घरे जाळल्यानंतर, महिलांची धिंड काढल्यानंतर समाजाला दिशा देण्याची आवश्यकता होती. पण मणिपूरकडे ढुंकण बघितले नाही. देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूरचे दु:ख समजून घेतले नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच मागच्या निवडणुकीत लोकांनी भाजपाचा पराभव करून तुम्ही निवडून आला. परंतु आज तुम्ही भाजपाच्या दावणीला जाऊन बसता. परंतु जेव्हा लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल तेव्हा लोकांना कोणते बटण दाबायचे आणि तुम्हाला कुठे पाठवायचे हे ठरवले आहे. त्यामुळे अधिक बोलायची गरज नाही. मी पुन्हा येईन असं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, त्यांनी मी पुन्हा येईन म्हटलं होते. पंतप्रधानांना सल्ला आहे. मी पुन्हा येईल विधान करताना देवेंद्र फडणवीसांचा सल्ला मार्गदर्शन घ्या, आज आहे त्या पदाच्या खाली आले असंही शरद पवारांनी मोदींवर टीका केली.

दरम्यान, लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्याचे काम भाजपाने केले. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा इथली सरकारे पाडण्यात आली. तुम्ही स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि केंद्राची सत्ता वापरून लोकांनी निवडलेली सरकारे पाडता. ही सगळी आव्हाने आपल्यासमोर आहेत असं शरद पवारांनी सभेत म्हटलं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा