शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या दृष्टीने चिंताजनक; गोळीबाराच्या घटनेवर शरद पवारांनी सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 13:46 IST

उल्हासनगर भाजपा आमदारानं केलेल्या गोळीबारावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मुंबई - राज्यात सत्तेचा गैरवापर होतोय, हे चिंताजनक आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उल्हासनगरच्या गोळीबारावर भाष्य केले आहे. शुक्रवारी रात्री उल्हासनगर येथे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले असून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

या घटनेबाबत शरद पवार यांनी म्हटलं की, सत्तेचा गैरवापर केला जातोय हे दिसून येते. गोळीबाराची घटना व्हायला लागली आणि राज्य सरकारची त्या सगळ्याबाबतीत बघ्याची भूमिका असेल तर राज्य आज कोणत्या दिशेने चाललंय त्याचे एक उदाहरण आहे. राज्यात अशा गोष्टी घडतायेत ते महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे असं त्यांनी सांगितले आहे. 

...उद्याच्या निवडणुकीत परिणाम दिसतील

महाविकास आघाडीतील बैठकीत चर्चा सकारात्मक झाली. प्रकाश आंबेडकर म्हणतायेत ते तथ्य आहे. आपण एकत्र येतोय पण किमान समान कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील काळात मतभेद टाळायचे असतील तर त्यावर चर्चा व्हायला हवी अशी त्यांची अपेक्षा आहे. ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीनंतर आम्ही इंडिया आघाडीत आहोत हे जाहीर केले. मागच्या निवडणुकीत काँग्रेस आणि टीएमसी एकमेकांविरोधात आक्रमक लढले. भाजपाचा पराभव करण्यासाठी जे करावे लागेल ती तयारी त्यांची आहे. नीतीश कुमारांनी एनडीएसोबत जायचाच निर्णय घेतला. इंडिया आघाडीची बैठक त्यांनीच पुढाकार घेऊन केली. त्या नीतीश कुमार यांनी आक्रमकपणे भाजपाला विरोध केला. जे घडलं ते चांगले नाही. बिहारच्या लोकांनाही ते आवडले नाही. त्याचे परिणाम उद्याच्या निवडणुकीतही दिसतील असंही शरद पवारांनी नीतीश कुमारांनी घेतलेल्या निर्णयावर म्हटलं आहे. 

कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र माझा?

दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकारवर घणाघात केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात गुन्हागारीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत मी अधिवेशनातही बोललो होतो मात्र परिस्थिती जैसे थेच दिसत आहे. पुण्यात दिवसाढवळ्या हत्या होत आहेत, कोयता गँगचा उच्छाद सुरुच आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही कधी हत्या होते तर कधी गोळीबार. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर येथे घडलेली फायरिंगची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आमदारांनीच पोलिसांसमोर गोळीबार करावा आणि तेही पोलीस स्टेशनमध्ये हे अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात या पूर्वी असे कधी घडत नव्हते. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना नेमके कोण पाठीशी घालत आहे असा मोठा प्रश्न आज राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. साधुसंतांची भूमी म्हणून ओळख असणारे आपले महाराष्ट्र राज्य, गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखला जावू नये ही भीती आहे. कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

टॅग्स :Ganpat Gaikwadगणपत गायकवाडSharad Pawarशरद पवारMahesh Gaikwadमहेश गायकवाडFiringगोळीबारBJPभाजपा