शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

राज्याच्या दृष्टीने चिंताजनक; गोळीबाराच्या घटनेवर शरद पवारांनी सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 13:46 IST

उल्हासनगर भाजपा आमदारानं केलेल्या गोळीबारावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मुंबई - राज्यात सत्तेचा गैरवापर होतोय, हे चिंताजनक आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उल्हासनगरच्या गोळीबारावर भाष्य केले आहे. शुक्रवारी रात्री उल्हासनगर येथे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले असून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

या घटनेबाबत शरद पवार यांनी म्हटलं की, सत्तेचा गैरवापर केला जातोय हे दिसून येते. गोळीबाराची घटना व्हायला लागली आणि राज्य सरकारची त्या सगळ्याबाबतीत बघ्याची भूमिका असेल तर राज्य आज कोणत्या दिशेने चाललंय त्याचे एक उदाहरण आहे. राज्यात अशा गोष्टी घडतायेत ते महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे असं त्यांनी सांगितले आहे. 

...उद्याच्या निवडणुकीत परिणाम दिसतील

महाविकास आघाडीतील बैठकीत चर्चा सकारात्मक झाली. प्रकाश आंबेडकर म्हणतायेत ते तथ्य आहे. आपण एकत्र येतोय पण किमान समान कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील काळात मतभेद टाळायचे असतील तर त्यावर चर्चा व्हायला हवी अशी त्यांची अपेक्षा आहे. ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीनंतर आम्ही इंडिया आघाडीत आहोत हे जाहीर केले. मागच्या निवडणुकीत काँग्रेस आणि टीएमसी एकमेकांविरोधात आक्रमक लढले. भाजपाचा पराभव करण्यासाठी जे करावे लागेल ती तयारी त्यांची आहे. नीतीश कुमारांनी एनडीएसोबत जायचाच निर्णय घेतला. इंडिया आघाडीची बैठक त्यांनीच पुढाकार घेऊन केली. त्या नीतीश कुमार यांनी आक्रमकपणे भाजपाला विरोध केला. जे घडलं ते चांगले नाही. बिहारच्या लोकांनाही ते आवडले नाही. त्याचे परिणाम उद्याच्या निवडणुकीतही दिसतील असंही शरद पवारांनी नीतीश कुमारांनी घेतलेल्या निर्णयावर म्हटलं आहे. 

कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र माझा?

दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकारवर घणाघात केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात गुन्हागारीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत मी अधिवेशनातही बोललो होतो मात्र परिस्थिती जैसे थेच दिसत आहे. पुण्यात दिवसाढवळ्या हत्या होत आहेत, कोयता गँगचा उच्छाद सुरुच आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही कधी हत्या होते तर कधी गोळीबार. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर येथे घडलेली फायरिंगची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आमदारांनीच पोलिसांसमोर गोळीबार करावा आणि तेही पोलीस स्टेशनमध्ये हे अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात या पूर्वी असे कधी घडत नव्हते. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना नेमके कोण पाठीशी घालत आहे असा मोठा प्रश्न आज राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. साधुसंतांची भूमी म्हणून ओळख असणारे आपले महाराष्ट्र राज्य, गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखला जावू नये ही भीती आहे. कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

टॅग्स :Ganpat Gaikwadगणपत गायकवाडSharad Pawarशरद पवारMahesh Gaikwadमहेश गायकवाडFiringगोळीबारBJPभाजपा