शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

"राजकारणात नैतिकतेला महत्त्व, धनंजय मुंडेनी तात्काळ राजीनामा द्यावा"; प्रवीण दरेकरांची मागणी

By देवेश फडके | Updated: January 14, 2021 17:42 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे विधान केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देधनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा- प्रवीण दरेकरराजकारणात नैतिकता, नीतिमूल्ये महत्त्वाची - प्रवीण दरेकरभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही हीच भूमिका

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे विधान केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत, हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा देणे अपेक्षित आहे, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. चौकशीत ते निर्देष असतील तर, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात समावून घेतले जाऊ शकते. ही माझ्यासह भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित भूमिका आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादीची पहिली भूमिका चाचपडणारी होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ती मांडली होती. मात्र, खुद्द शरद पवार यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. संबंधित महिलेने केलेले आरोप मोठे आहेत. राजकारणात शेवटी नीतिमूल्य आणि नैतिकतेला फार महत्व आहे. राज्यात अशा घटना घडल्या किंवा प्रसंग आले, त्यावेळी संबंधित मंत्र्याकडून राजीनामा घेतल्याची अनेक उदाहरण आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

शिवशाही सरकार असतानाही काही मंत्र्यांवर आरोप झाले होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनीही त्यांचे राजीनामे घेतले होते. त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे. कारण आता शरद पवारांचीही भूमिका स्पष्ट झाली आहे, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, धनंजय मुंडे प्रकरणावर मला अधिक काही बोलायचे नाही. नवाब मलिक यांनी भूमिका मांडली, तीच भूमिका राष्ट्रवादी पक्षाची आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तर, पक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाही. तसेच मी राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणpravin darekarप्रवीण दरेकरDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा