शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पवारांच्या खेळीने पक्षांतर, युतीच्या चर्चांना 'ब्रेक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 13:10 IST

राजकीय वर्तुळात पवार यांचा दबदबा यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. ईडीची घटना आणि अजित पवारांचा राजीनामा ही पवारांचीच खेळी असून त्यांच्या खेळीमुळे युती आणि पक्षांतराचे मुद्दे मागे पडल्याची सध्याची स्थिती आहे.

मुंबई - विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे युती आणि आघाडीची बोलणी सुरू आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेला विरोधी पक्षाला फारशी संधी नसल्याचे गृहीत धरून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले आहे. त्यामुळे सगळीकडे पक्षांतर आणि युतीची लांबलेली बोलणीच चर्चेत होती. परंतु, गेल्या दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी घेतलेल्या स्टँडमुळे राजकारण ढवळून निघाले असून युतीचा वाद आणि पक्षांतराच्या चर्चांना ब्रेक लागला आहे.

निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. विरोधी पक्षातील 30 हून अधिक नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष गळीगात्र झाला होता. त्याला उभारी देण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेत महाराष्ट्र दौरा काढला. मात्र शिखर बँकेत झालेल्या कथित घोटाळ्यावरून ईडीने पवारांवर नाव नसताना गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादीला आयतेच कोलीत मिळाले. त्याचा फायदा घेणार नाही ते पवार कसले. त्यानुसार पवारांनी 27 सप्टेंबर रोजी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर होणार असल्याची घोषणा केली होती.

शरद पवार यांनी घोषणा केल्याप्रमाणे शुक्रवारी मुंबई गाठली. त्यामुळे माध्यमांवर सकाळपासूनच शरद पवार आणि ईडीचे कार्यालय चर्चेत आले होते. दिवसभर सोशल मीडियावर देखील पवारांशिवाय काहीही दिसत नव्हते. मागील 5-6 दिवसांपासून युतीच्या चर्चांनी माध्यमं व्यापून गेले असताना शुक्रवारचा दिवस पवारांना व्यापून टाकला. त्यापाठोपाठ सांयकाळी अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे पुन्हा राजकारण ढवळून निघाले.

राजकीय वर्तुळात पवार यांचा दबदबा यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. ईडीची घटना आणि अजित पवारांचा राजीनामा ही पवारांचीच खेळी असून त्यांच्या खेळीमुळे युती आणि पक्षांतराचे मुद्दे मागे पडल्याची सध्याची स्थिती आहे.