शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:07 IST

Maharashtra Farmer Success Story News: शरद पवार यांनी सुरू केलेल्या एका योजनेतून प्रेरणा घेऊन या शेतकऱ्याने वजनदार आंब्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. 'शरद मँगो' या नावाने या आंब्याला पेटंटही मिळाले आहे.

Maharashtra Farmer Success Story News: महाराष्ट्रात विविध प्रकारचे पीक घेतले जाते. महाराष्ट्रातील शेतकरी प्रयोगशील असतात. महाराष्ट्रात शेतीतील अनेक प्रकारचे प्रयोग यशस्वी करून दाखवले आहेत. आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. आताच्या घडीला आंब्याचा सीझन सुरू आहे. यातच एका मराठमोळ्या शेतकऱ्याने तीन किलो वजन असलेल्या आंब्याचे पीक घेतले आहे. विशेष म्हणजे या आंब्याला या शेतकऱ्यांने शरद पवार यांचे नाव दिले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील एका शेतकऱ्याने आपल्या बागेत तब्बल ३ किलो वजनाचे आंबे पिकवले आहेत. विशेष म्हणजे या वजनदार आंब्याला 'शरद मँगो' असे नाव दिले आहे. हा आंबा पाहण्यासाठी सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोक येत आहेत. वजनदार आंब्याचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या शेतकरी बांधवाचे नाव दत्तात्रय घाडगे असे आहे. घाडगे यांचा 'शरद मँगो' चांगलाच भाव खात आहे. 

'शरद मँगो'ची खासियत काय?

या नव्या प्रकारच्या आंब्याची खासियत म्हणजे केवळ त्याचे वजनच नाही, तर त्यामागील संशोधनात्मक शेतीही आहे. घाडगे यांनी आपल्या आठ एकर शेतात १७ विविध प्रजातींची आंब्याची झाडे लावली आहेत. त्यात ग्राफ्टिंग करून या प्रजाती विकसित केल्या आहे. विशेष म्हणजे, फळ बाग योजना या सरकारी योजनेचा लाभ घेत त्यांनी हा शेतीतील प्रयोग केला आहे. याच अनोख्या वजनदार आंब्याला शरद मँगो नाव दिले आहे. तर असेच एक वेगळेपण असलेल्या आंब्याला त्यांना पेटंट मिळाले असून, त्याचे नाव संत सावता माळी असे ठेवण्यात आले आहे. 

'शरद मँगो' महाराष्ट्राची नाही, तर देशाची ओळख बनू शकतो

सन १९९२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या फळ बाग योजनेच्या आधारे दत्तात्रेय घाडगे यांनी आंबाच्या प्रयोगाला सुरू केली. त्यामुळे शरद पवारांच्या पूर्वपरवानगीने तब्बल ३ किलोच्या वजनदार आंब्याला 'शरद मँगो' असे नाव देण्यात आले तसे पेटंट त्यांना मिळाले. दत्तात्रय घाडगे यांना खात्री आहे की, 'शरद मँगो' भविष्यात महाराष्ट्राचाच नाही, तर देशभरातील ओळख बनू शकतो. तसेच शेतकऱ्यांना त्यातून एकरी २५ लाखांचे उत्पन्न मिळू शकते. विविध भागात हे पीक चांगल्या पद्धतीने घेतल्यास भविष्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखता येऊ शकतात, असा विश्वास दत्तात्रय घाडगे यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAgriculture Schemeकृषी योजनाMangoआंबाMangoआंबाSharad Pawarशरद पवार