शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:07 IST

Maharashtra Farmer Success Story News: शरद पवार यांनी सुरू केलेल्या एका योजनेतून प्रेरणा घेऊन या शेतकऱ्याने वजनदार आंब्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. 'शरद मँगो' या नावाने या आंब्याला पेटंटही मिळाले आहे.

Maharashtra Farmer Success Story News: महाराष्ट्रात विविध प्रकारचे पीक घेतले जाते. महाराष्ट्रातील शेतकरी प्रयोगशील असतात. महाराष्ट्रात शेतीतील अनेक प्रकारचे प्रयोग यशस्वी करून दाखवले आहेत. आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. आताच्या घडीला आंब्याचा सीझन सुरू आहे. यातच एका मराठमोळ्या शेतकऱ्याने तीन किलो वजन असलेल्या आंब्याचे पीक घेतले आहे. विशेष म्हणजे या आंब्याला या शेतकऱ्यांने शरद पवार यांचे नाव दिले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील एका शेतकऱ्याने आपल्या बागेत तब्बल ३ किलो वजनाचे आंबे पिकवले आहेत. विशेष म्हणजे या वजनदार आंब्याला 'शरद मँगो' असे नाव दिले आहे. हा आंबा पाहण्यासाठी सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोक येत आहेत. वजनदार आंब्याचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या शेतकरी बांधवाचे नाव दत्तात्रय घाडगे असे आहे. घाडगे यांचा 'शरद मँगो' चांगलाच भाव खात आहे. 

'शरद मँगो'ची खासियत काय?

या नव्या प्रकारच्या आंब्याची खासियत म्हणजे केवळ त्याचे वजनच नाही, तर त्यामागील संशोधनात्मक शेतीही आहे. घाडगे यांनी आपल्या आठ एकर शेतात १७ विविध प्रजातींची आंब्याची झाडे लावली आहेत. त्यात ग्राफ्टिंग करून या प्रजाती विकसित केल्या आहे. विशेष म्हणजे, फळ बाग योजना या सरकारी योजनेचा लाभ घेत त्यांनी हा शेतीतील प्रयोग केला आहे. याच अनोख्या वजनदार आंब्याला शरद मँगो नाव दिले आहे. तर असेच एक वेगळेपण असलेल्या आंब्याला त्यांना पेटंट मिळाले असून, त्याचे नाव संत सावता माळी असे ठेवण्यात आले आहे. 

'शरद मँगो' महाराष्ट्राची नाही, तर देशाची ओळख बनू शकतो

सन १९९२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या फळ बाग योजनेच्या आधारे दत्तात्रेय घाडगे यांनी आंबाच्या प्रयोगाला सुरू केली. त्यामुळे शरद पवारांच्या पूर्वपरवानगीने तब्बल ३ किलोच्या वजनदार आंब्याला 'शरद मँगो' असे नाव देण्यात आले तसे पेटंट त्यांना मिळाले. दत्तात्रय घाडगे यांना खात्री आहे की, 'शरद मँगो' भविष्यात महाराष्ट्राचाच नाही, तर देशभरातील ओळख बनू शकतो. तसेच शेतकऱ्यांना त्यातून एकरी २५ लाखांचे उत्पन्न मिळू शकते. विविध भागात हे पीक चांगल्या पद्धतीने घेतल्यास भविष्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखता येऊ शकतात, असा विश्वास दत्तात्रय घाडगे यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAgriculture Schemeकृषी योजनाMangoआंबाMangoआंबाSharad Pawarशरद पवार