शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

Shahajibapu Patil : "ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून त्यांना खोके दिसताहेत"; शहाजीबापू पाटलांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 14:56 IST

Shahajibapu Patil And Shivsena : बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी 50 खोक्यांवरून टीका करणाऱ्यांवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष पराकोटीला जात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचे काही आमदार आणि काही अपक्ष आमदार यांच्या साथीने शिंदे गटाने भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तास्थापना केली. या सर्व आमदारांना भाजपाकडून प्रत्येकी ५० कोटी रूपये देण्यात आले असा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी 50 खोक्यांवरून टीका करणाऱ्यांवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.

"ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून त्यांना खोके दिसताहेत, तुमचं नेमकं किती अस्तित्व शिल्लक राहीलं याचं आत्मचिंतन तुम्ही करा" असं म्हणत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच "तीन पक्षांचं सरकार बनताना आम्हाला हॉटेलमध्ये कोंडलं होतं. तुमचं तिकडे खोक्याचं काय झालं असं आम्ही म्हटलं तर आता का वाईट वाटतं. सत्ता गेली ती माणसं पातळी सोडून राजकारण करायला लागली" असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

"महाराष्ट्रच्या राजकारणात झालेली ही १०० टक्के वैचारिक क्रांती"

"कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आमचं काय होणार याची चिंता सामना पेपरने करू नये. तुमचं नेमकं किती अस्तित्व शिल्लक राहीलं याचं आत्मचिंतन तुम्ही करावं. महाराष्ट्रच्या राजकारणात झालेली ही १०० टक्के वैचारिक क्रांती आहे. जनतेच्या कल्याणासाठी हे सरकार आहे. शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार चांगलं काम करतं आहे. दोन्ही नेते चांगले अनुभवी आहेत. जनतेचे प्रश्न सुटतील असा विश्वास आहे" असं पाटील यांनी म्हटलं आहे. 

"तीन पक्षांचं सरकार बनताना आम्हाला हॉटेलमध्ये कोंडलं होतं"

"ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून आहे त्यांना खोके दिसत आहेत. त्यांचं आयुष्यच खोक्यावरच गेलं. सगळे खोक्याचेच गडी. त्यामुळे त्यांना आता यांना किती खोके मिळाले हे वाटतंय. तीन पक्षांचं सरकार बनताना आम्हाला हॉटेलमध्ये कोंडलं होतं. तुमचं तिकडे खोक्याचं काय झालं असं आम्ही म्हटलं तर आता का वाईट वाटतं. सत्ता गेली ती माणसं पातळी सोडून राजकारण करायला लागली" असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे