शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

Shahajibapu Patil : "ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून त्यांना खोके दिसताहेत"; शहाजीबापू पाटलांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 14:56 IST

Shahajibapu Patil And Shivsena : बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी 50 खोक्यांवरून टीका करणाऱ्यांवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष पराकोटीला जात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचे काही आमदार आणि काही अपक्ष आमदार यांच्या साथीने शिंदे गटाने भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तास्थापना केली. या सर्व आमदारांना भाजपाकडून प्रत्येकी ५० कोटी रूपये देण्यात आले असा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी 50 खोक्यांवरून टीका करणाऱ्यांवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.

"ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून त्यांना खोके दिसताहेत, तुमचं नेमकं किती अस्तित्व शिल्लक राहीलं याचं आत्मचिंतन तुम्ही करा" असं म्हणत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच "तीन पक्षांचं सरकार बनताना आम्हाला हॉटेलमध्ये कोंडलं होतं. तुमचं तिकडे खोक्याचं काय झालं असं आम्ही म्हटलं तर आता का वाईट वाटतं. सत्ता गेली ती माणसं पातळी सोडून राजकारण करायला लागली" असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

"महाराष्ट्रच्या राजकारणात झालेली ही १०० टक्के वैचारिक क्रांती"

"कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आमचं काय होणार याची चिंता सामना पेपरने करू नये. तुमचं नेमकं किती अस्तित्व शिल्लक राहीलं याचं आत्मचिंतन तुम्ही करावं. महाराष्ट्रच्या राजकारणात झालेली ही १०० टक्के वैचारिक क्रांती आहे. जनतेच्या कल्याणासाठी हे सरकार आहे. शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार चांगलं काम करतं आहे. दोन्ही नेते चांगले अनुभवी आहेत. जनतेचे प्रश्न सुटतील असा विश्वास आहे" असं पाटील यांनी म्हटलं आहे. 

"तीन पक्षांचं सरकार बनताना आम्हाला हॉटेलमध्ये कोंडलं होतं"

"ज्यांची प्रवृतीच राजकारणात खोक्यावर अवलंबून आहे त्यांना खोके दिसत आहेत. त्यांचं आयुष्यच खोक्यावरच गेलं. सगळे खोक्याचेच गडी. त्यामुळे त्यांना आता यांना किती खोके मिळाले हे वाटतंय. तीन पक्षांचं सरकार बनताना आम्हाला हॉटेलमध्ये कोंडलं होतं. तुमचं तिकडे खोक्याचं काय झालं असं आम्ही म्हटलं तर आता का वाईट वाटतं. सत्ता गेली ती माणसं पातळी सोडून राजकारण करायला लागली" असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे