धाटावमध्ये सांडपाणी वाहिनी फुटली
By Admin | Updated: September 5, 2016 03:08 IST2016-09-05T03:08:40+5:302016-09-05T03:08:40+5:30
रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये मागील कित्येक महिन्यांपासून जीर्ण अवस्थेत असलेली रासायनिक सांडपाणी वाहिनी रविवारी अचानक फुटली.

धाटावमध्ये सांडपाणी वाहिनी फुटली
धाटाव : रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये मागील कित्येक महिन्यांपासून जीर्ण अवस्थेत असलेली रासायनिक सांडपाणी वाहिनी रविवारी अचानक फुटली. सबंध रोहेकरांची जीवनवाहिनी असलेली कुंडलिका नदी आज अक्षरश: हिरवीगार झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र सततच्या जलप्रदूषणामुळे नदीकिनारी असलेल्या नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
धाटाव औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी वाहिनीच्या दुरु स्ती कामावर आजवर कोट्यवधी रु पये खर्च झाले आहेत. मात्र निकृष्ट दर्जाचे काम करून संबंधित ठेकेदारानेही प्रशासनाला चुना लावल्याची ही चर्चा आहे. आज कित्येक महिन्यांपासून जीर्ण अवस्थेत असलेली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची रासायनिक सांडपाणी वाहिनी ही रासायनिक प्रक्रि या केंद्रातील टँक भरल्यामुळे दरम्यान सांडपाणी वाहिनीवर ताण आल्यामुळे ही वाहिनी एमआयडीसी अंतर्गत रस्त्यावरील एक्सेल नाका ते रेप्टाकोस कंपनी रस्त्यालगत डाव्या बाजूला फुटल्याने जलवाहिनीतील हिरव्या रंगाचे रसायन लगतच्या नाल्याद्वारे सर्वत्र पसरले. सबंध परिसरात पाणीच पाणी झाले असून हे पाणी अंबा नदीवाटे रोठखुर्द गावानजीक कुंडलिका नदीच्या पात्रात घुसल्याने संपूर्ण कुंडलिका हिरवीगार झाली.
रोहा तालुक्यात धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांच्या जल प्रदूषणाबरोबर वायू प्रदूषणाचा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. या वायू प्रदूषणापासून नागरिक त्रस्त झाले आहेत.विविध प्रकारच्या रासायनिक कारखान्यांतून सोडण्यात येणाऱ्या दुर्मीळ वायूचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.पावसाळ्यात धुक्याचा आधार घेत बिनधास्त वायू वातावरणात सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची अनेकदा मागणी करूनही प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे मात्र यावर नियंत्रण नसल्याचा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे. या परिसरात अनेक कंपन्यांनी वायुप्रदूषणाचे अक्षरश: थैमान घातले आहे. औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे याकडे गांभीर्याने लक्ष नसल्याने जल व वायू प्रदूषणाविषयी कारखान्यांविरोधात स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
>परिसरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
रोहा तालुक्यात धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांच्या जल प्रदूषणाबरोबर वायू प्रदूषणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. या परिसरात अनेक कंपन्यांनी वायुप्रदूषणाचे अक्षरश: थैमान घातले आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे मात्र यावर नियंत्रण नसल्याचा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे. औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे याकडे गांभीर्याने लक्ष नसल्याचा स्थानिकांचा आरोप असून जल व वायुप्रदूषणाविषयी कारखान्यांविरोधात स्थानिक मंडळींनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
>धाटाव औद्योगिक वसाहतीत जीर्ण अवस्थेत असलेली सांडपाणी वाहिनी रस्त्यालगत अचानक फुटली. ही घटना उशिरा निदर्शनास आल्याने संबंधित कारखान्यांना सांडपाणी सोडू नये असे सांगण्यात आले. या सांडपाणी वाहिनीची गळती थांबविण्याचे काम सुरु केल्याने हे काम लवकरात लवकर होईल.
- पी. ए.पांचाळ, उप अभियंता,
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रोहा