शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

एकाच घरातील सात जण सरणावर होते, समृद्धीवरच्या मृतांना मदत पण...; भास्कर जाधवांची एकनाथ शिंदेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 16:48 IST

समृद्धी महामार्गावरील मृतांना मदत, मग माझ्या मतदार संघातल्यांना का नाही? उद्धव ठाकरेंसोबत गेलो म्हणून का...

हिवाळी अधिवेशनामध्ये बोलू दिले नाही म्हणून पुन्हा येणार नाही असे सांगणाऱ्या भास्कर जाधवांनी आज विधानसभेत रोखठोक भाषण केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे सरकारवर दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, मच्छीमारी बांधवांची जमीन, अपघात ग्रस्तांना मदत आदींवर मुद्दे उपस्थित केले. तसेच कोकणाला निधी देताना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. 

माझ्या गुहागर मतदारसंघात एकाच कुटुंबातील नऊ जण आणि शेजारचा चालक असे मिळून १० जण अपघातात ठार झाले. समृद्धी महामार्गावर अपघात झालेल्यांना शिंदेंनी मदत जाहीर केली, अन्य ठिकाणच्या मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली. पण सात प्रेते सरणावर असताना शिंदेंनी मला ती खासगी गाडी होती असे सांगत मदत नाकारली. मुंबई गोवा महामार्गावरील हा अपघात होता. २०११ मध्ये काम सुरु झालेले, आजही पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराच्या चुकीमुळे म्हातारा म्हातारीची दोन्ही मुले, लेकी, त्यांच्या सुना, त्यांची नातवंडे सगळे जाग्यावर गेले होते. त्यांना मदत करा अशी विनंती केली होती, असे जाधव म्हणाले. 

पुण्याला बँजो पार्टीगेलेली १३ माणसे गेली, धर्माधिकारी पुरस्कारात माणसे गेली त्यांना मदत केली, दापोलीत काही दिवसांपूर्वी आठ माणसे गेली त्यांना मदत केली. एका चितेवर सात जणांना अग्नी दिला. सरकार की कोण आहेत, तुमच्याबद्दल वेगळा शब्द वापरला पाहिजे. उदय सामंतांनी मेसेज करून मदत करतोय असे सांगितलेले, असे भास्कर जाधव म्हणाले. 

एकनाथ शिंदेवर मी आदरानेच बोलतोय. पण मी उद्धव ठाकरेंबरोबर राहिलो म्हणून असे करायचे, राजकारणासाठी माणसे किती कठोर होतात, किती निष्ठुर होतात, मेलेल्या मनाची होतात, हे यावेळी मला सांगायचे आहे, असे जाधव म्हणाले. यावेळी सत्ताधाऱ्यांच्या बाकावरून जाधव यांच्यावर टोलवा टोलवी सुरु झाली. तेव्हा जाधवांनी सत्ताधाऱ्यांना सात मृतदेहांच्या विषयावर तुम्ही टिंगल टवाळी करताय, असा आरोप केला. 

 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना