शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

एकाच घरातील सात जण सरणावर होते, समृद्धीवरच्या मृतांना मदत पण...; भास्कर जाधवांची एकनाथ शिंदेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 16:48 IST

समृद्धी महामार्गावरील मृतांना मदत, मग माझ्या मतदार संघातल्यांना का नाही? उद्धव ठाकरेंसोबत गेलो म्हणून का...

हिवाळी अधिवेशनामध्ये बोलू दिले नाही म्हणून पुन्हा येणार नाही असे सांगणाऱ्या भास्कर जाधवांनी आज विधानसभेत रोखठोक भाषण केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे सरकारवर दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, मच्छीमारी बांधवांची जमीन, अपघात ग्रस्तांना मदत आदींवर मुद्दे उपस्थित केले. तसेच कोकणाला निधी देताना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. 

माझ्या गुहागर मतदारसंघात एकाच कुटुंबातील नऊ जण आणि शेजारचा चालक असे मिळून १० जण अपघातात ठार झाले. समृद्धी महामार्गावर अपघात झालेल्यांना शिंदेंनी मदत जाहीर केली, अन्य ठिकाणच्या मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली. पण सात प्रेते सरणावर असताना शिंदेंनी मला ती खासगी गाडी होती असे सांगत मदत नाकारली. मुंबई गोवा महामार्गावरील हा अपघात होता. २०११ मध्ये काम सुरु झालेले, आजही पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराच्या चुकीमुळे म्हातारा म्हातारीची दोन्ही मुले, लेकी, त्यांच्या सुना, त्यांची नातवंडे सगळे जाग्यावर गेले होते. त्यांना मदत करा अशी विनंती केली होती, असे जाधव म्हणाले. 

पुण्याला बँजो पार्टीगेलेली १३ माणसे गेली, धर्माधिकारी पुरस्कारात माणसे गेली त्यांना मदत केली, दापोलीत काही दिवसांपूर्वी आठ माणसे गेली त्यांना मदत केली. एका चितेवर सात जणांना अग्नी दिला. सरकार की कोण आहेत, तुमच्याबद्दल वेगळा शब्द वापरला पाहिजे. उदय सामंतांनी मेसेज करून मदत करतोय असे सांगितलेले, असे भास्कर जाधव म्हणाले. 

एकनाथ शिंदेवर मी आदरानेच बोलतोय. पण मी उद्धव ठाकरेंबरोबर राहिलो म्हणून असे करायचे, राजकारणासाठी माणसे किती कठोर होतात, किती निष्ठुर होतात, मेलेल्या मनाची होतात, हे यावेळी मला सांगायचे आहे, असे जाधव म्हणाले. यावेळी सत्ताधाऱ्यांच्या बाकावरून जाधव यांच्यावर टोलवा टोलवी सुरु झाली. तेव्हा जाधवांनी सत्ताधाऱ्यांना सात मृतदेहांच्या विषयावर तुम्ही टिंगल टवाळी करताय, असा आरोप केला. 

 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना