शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

राज्यात उष्माघातामुळे सात जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 06:43 IST

४१४ रुग्ण; अकोल्यातील नागरिकांना उकाड्याचा सर्वाधिक त्रास

मुंबई : राज्यात उन्हाचा पारा चढत आहे, त्यात राजस्थान आणि वायव्य भारतातून उष्ण वारे गुजरात, मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात येत असल्याने, राज्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. १५ मार्चपासून राज्यभरात उष्माघाताचे सात बळी गेले असून, ४१८ रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात सर्वाधिक अकोला पाठोपाठ नागपूरमध्ये उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत, तर औरंगाबाद, हिंगोली येथे प्रत्येकी दोन, परभणी, धुळे आणि बीड येथे प्रत्येकी एक अशा सात रुग्णांचा बळी गेला आहे. उष्माघात नियंत्रण कक्षाच्या नोंदीनुसार अकोल्यात १८६, नागपूर १४३, लातूर ६१, नाशिक २१, औरंगाबाद ६, पुणे १ अशा एकूण ४१८ रुग्णांचा समावेश आहे. परभणी, धुळे, बीड येथे प्रत्येकी एक, तर औरंगाबाद आणि हिंगोलीत प्रत्येकी दोन रुग्ण दगावले आहेत.उष्माघाताच्या रुग्णांसाठी कुलिंग वॉर्ड तयार करण्याचे आरोग्य विभागाचे आदेश आहेत. रक्तदाब, मधुमेह, किंवा अन्य आजाराच्या रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रुग्णांनी उन्हात बाहेर न पडता घरीच राहावे. कारण अशा रुग्णांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता अधिक आहे, असा सल्ला राज्याचे आरोग्य सहसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी दिला.अशी घ्या काळजीच्सकाळी ११ ते ४ या वेळात उन्हात काम करणे, फिरणे टाळा.च्फिक्या रंगाचे सैल व सुती कपडे घालावे.च्गॉगल, टोपी, स्कार्फचा वापरा.च्फ्रीजचे पाणी न पिता माठातले पाणी, वाळा, गुलाबाच्या पाकळ्या घालून नैसर्गिक थंड केलेले पाणी प्यावे.च्बाहेर पडताना पाण्याची बाटली जवळ ठेवावी. तापमान वाढल्यास पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.च्गरोदर स्त्रिया, कामगार व आजारी व्यक्तींनी काळजी घ्यावी.च्तहान लागण्याची वाट न बघता दररोज आठ ते दहा पेले पाणी प्यावे. नारळाचे पाणी, कैरीचे पन्हे, लिंबू सरबत, लस्सी, ताक व ओआरएसची भुकटी पाण्यात टाकून घेत राहावी.च्आहारात कलिंगड, खरबूज, लिंबू, कांदा, संत्रे यांचा वापर करावा.च्लघवीचा रंग जर जास्त पिवळसर झाला किंवा लघवीचे प्रमाण कमी झाल्यास, पाणी व वर नमूद केलेल्या पेयांचे प्रमाण वाढवावे