शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात उष्माघातामुळे सात जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 06:43 IST

४१४ रुग्ण; अकोल्यातील नागरिकांना उकाड्याचा सर्वाधिक त्रास

मुंबई : राज्यात उन्हाचा पारा चढत आहे, त्यात राजस्थान आणि वायव्य भारतातून उष्ण वारे गुजरात, मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात येत असल्याने, राज्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. १५ मार्चपासून राज्यभरात उष्माघाताचे सात बळी गेले असून, ४१८ रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात सर्वाधिक अकोला पाठोपाठ नागपूरमध्ये उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत, तर औरंगाबाद, हिंगोली येथे प्रत्येकी दोन, परभणी, धुळे आणि बीड येथे प्रत्येकी एक अशा सात रुग्णांचा बळी गेला आहे. उष्माघात नियंत्रण कक्षाच्या नोंदीनुसार अकोल्यात १८६, नागपूर १४३, लातूर ६१, नाशिक २१, औरंगाबाद ६, पुणे १ अशा एकूण ४१८ रुग्णांचा समावेश आहे. परभणी, धुळे, बीड येथे प्रत्येकी एक, तर औरंगाबाद आणि हिंगोलीत प्रत्येकी दोन रुग्ण दगावले आहेत.उष्माघाताच्या रुग्णांसाठी कुलिंग वॉर्ड तयार करण्याचे आरोग्य विभागाचे आदेश आहेत. रक्तदाब, मधुमेह, किंवा अन्य आजाराच्या रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रुग्णांनी उन्हात बाहेर न पडता घरीच राहावे. कारण अशा रुग्णांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता अधिक आहे, असा सल्ला राज्याचे आरोग्य सहसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी दिला.अशी घ्या काळजीच्सकाळी ११ ते ४ या वेळात उन्हात काम करणे, फिरणे टाळा.च्फिक्या रंगाचे सैल व सुती कपडे घालावे.च्गॉगल, टोपी, स्कार्फचा वापरा.च्फ्रीजचे पाणी न पिता माठातले पाणी, वाळा, गुलाबाच्या पाकळ्या घालून नैसर्गिक थंड केलेले पाणी प्यावे.च्बाहेर पडताना पाण्याची बाटली जवळ ठेवावी. तापमान वाढल्यास पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.च्गरोदर स्त्रिया, कामगार व आजारी व्यक्तींनी काळजी घ्यावी.च्तहान लागण्याची वाट न बघता दररोज आठ ते दहा पेले पाणी प्यावे. नारळाचे पाणी, कैरीचे पन्हे, लिंबू सरबत, लस्सी, ताक व ओआरएसची भुकटी पाण्यात टाकून घेत राहावी.च्आहारात कलिंगड, खरबूज, लिंबू, कांदा, संत्रे यांचा वापर करावा.च्लघवीचा रंग जर जास्त पिवळसर झाला किंवा लघवीचे प्रमाण कमी झाल्यास, पाणी व वर नमूद केलेल्या पेयांचे प्रमाण वाढवावे