शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
4
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
5
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
6
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
7
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
8
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
9
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
10
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
11
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
12
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
13
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
14
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
15
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
16
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
17
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
18
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
19
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
20
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार

राज्यात उष्माघातामुळे सात जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 06:43 IST

४१४ रुग्ण; अकोल्यातील नागरिकांना उकाड्याचा सर्वाधिक त्रास

मुंबई : राज्यात उन्हाचा पारा चढत आहे, त्यात राजस्थान आणि वायव्य भारतातून उष्ण वारे गुजरात, मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात येत असल्याने, राज्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. १५ मार्चपासून राज्यभरात उष्माघाताचे सात बळी गेले असून, ४१८ रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात सर्वाधिक अकोला पाठोपाठ नागपूरमध्ये उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत, तर औरंगाबाद, हिंगोली येथे प्रत्येकी दोन, परभणी, धुळे आणि बीड येथे प्रत्येकी एक अशा सात रुग्णांचा बळी गेला आहे. उष्माघात नियंत्रण कक्षाच्या नोंदीनुसार अकोल्यात १८६, नागपूर १४३, लातूर ६१, नाशिक २१, औरंगाबाद ६, पुणे १ अशा एकूण ४१८ रुग्णांचा समावेश आहे. परभणी, धुळे, बीड येथे प्रत्येकी एक, तर औरंगाबाद आणि हिंगोलीत प्रत्येकी दोन रुग्ण दगावले आहेत.उष्माघाताच्या रुग्णांसाठी कुलिंग वॉर्ड तयार करण्याचे आरोग्य विभागाचे आदेश आहेत. रक्तदाब, मधुमेह, किंवा अन्य आजाराच्या रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रुग्णांनी उन्हात बाहेर न पडता घरीच राहावे. कारण अशा रुग्णांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता अधिक आहे, असा सल्ला राज्याचे आरोग्य सहसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी दिला.अशी घ्या काळजीच्सकाळी ११ ते ४ या वेळात उन्हात काम करणे, फिरणे टाळा.च्फिक्या रंगाचे सैल व सुती कपडे घालावे.च्गॉगल, टोपी, स्कार्फचा वापरा.च्फ्रीजचे पाणी न पिता माठातले पाणी, वाळा, गुलाबाच्या पाकळ्या घालून नैसर्गिक थंड केलेले पाणी प्यावे.च्बाहेर पडताना पाण्याची बाटली जवळ ठेवावी. तापमान वाढल्यास पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.च्गरोदर स्त्रिया, कामगार व आजारी व्यक्तींनी काळजी घ्यावी.च्तहान लागण्याची वाट न बघता दररोज आठ ते दहा पेले पाणी प्यावे. नारळाचे पाणी, कैरीचे पन्हे, लिंबू सरबत, लस्सी, ताक व ओआरएसची भुकटी पाण्यात टाकून घेत राहावी.च्आहारात कलिंगड, खरबूज, लिंबू, कांदा, संत्रे यांचा वापर करावा.च्लघवीचा रंग जर जास्त पिवळसर झाला किंवा लघवीचे प्रमाण कमी झाल्यास, पाणी व वर नमूद केलेल्या पेयांचे प्रमाण वाढवावे