शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

विदर्भात सात शेतक-यांची आत्महत्या, अकोला दोन, चंद्रपुरात दोन तर गोंदियातील एकाचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 05:03 IST

नापिकी आणि कर्जापायी विदर्भात दिवाळीच्या दिवशी सात शेतक-यांनी आत्महत्या केली. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील वाठोडा येथे घडली.

यवतमाळ/चंद्रपूर/गोंदिया : नापिकी आणि कर्जापायी विदर्भात दिवाळीच्या दिवशी सात शेतक-यांनी आत्महत्या केली. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील वाठोडा येथे घडली. विशेष म्हणजे हे दोन्ही शेतकरी नात्याने एकमेकांचे व्याही आहेत. तर लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातही दोन शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. गोंदिया जिल्ह्यात एका शेतकºयाने गळफास लावला. तसेच अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील वरूड बिहाडे येथील दोन शेतकºयांनी आत्महत्या केली.वासुदेव विठोबा रोंगे (६७) आणि वासुदेव कृष्णराव राऊत (६५) दोघेही रा.वाठोडा (ता.पांढरकवडा), बंडू बोरकुटे, रा. कोर्धा, जगदीश गोपाळा माटे रा. कोदेपार (ता. नागभीड), तर दुर्योधन वाढवे (३२) रा. सोनेखारी (ता.तिरोडा, जि. चंद्रपूर) अशी मृत शेतकºयांची नावे आहेत.वाठोडा येथे गुरुवारी वासुदेव रोंगे आणि वासुदेव राऊत हे राऊत यांच्या घरी बसले होते. शेतीवर चर्चा सुरू होती. शेतीने कसा दगा दिला, असे म्हणत या दोघांनीही अचानक एकत्र विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच दोघांनाही करंजीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र राऊत यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर रोंगे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दिवाळीच्या दिवशी झालेल्या या घटनेने गावावर शोककळा पसरली. गावात कुणीही दिवाळी साजरी केली नाही. सायंकाळी अंत्यसंस्काराला परिसरातील शेकडो नागरिक आले होते.वासुदेव रोंगे यांच्याकडे पाच एकर शेती असून त्यांच्यावर ७० हजाराचे कर्ज आहे. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. तर वासुदेव राऊत यांच्याकडे १५ एकर शेती असून खासगी सावकाराचे कर्ज होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, चार मुली असा परिवार आहे. जिल्ह्यात सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांच्या आत्महत्या होत आहे. परंतु सामूहिक आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात कोर्धा येथील यशवंत बोरकुटे यांनी स्वत:च्या शेताजवळील मुरुमाच्या खाणीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यशवंतवर सेवा सहकारी सोसायटीचे व खाजगी कर्ज होते. ३१ मार्च २०१७ पर्यंत ते थकीत असल्याने त्यांना कर्जमाफी मिळणार नव्हती. त्यांना दीड एकर बरडी शेती आहे. उशिरा रोवणी केल्याने त्यांचा हंगाम निट नव्हता. उत्पन्न नाही. कर्जही माफ झाले नाही. लग्नाची मुलगी आहे. तिचे लग्न कसे करणार, या विवंचनेने ते ग्रासले होते. या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली, असे गावकºयांनी सांगितले. दुसºया घटनेत जगदीश माटे याने घराजवळील विहीरीत उडी घेऊन मृत्यूला कवटाळले. पुरेशा पावसाअभावी पूर्ण पीक सुकून गेले होते. सोसायटीचेही कर्ज होते.गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील सोनेखारी येथे गुरूवारी दुर्योधन चुडामन वाढवे (३२)या शेतकºयाने शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुर्योधनकडे चार एकर शेती आहे. त्याच्यावर जागृती पतसंस्थेचे १ लाख २५ हजार व युनियन बँकेचे ५० हजार आणि सेवा सहकारी संस्थेचे ५० हजार, मायक्रो फायन्सास आणि सावकाराचे ३० हजार असे एकूण ३ लाखांचे कर्ज होते. कर्जाची परतफेड कशी करायची याच विंवचनेत तो मागील काही दिवसांपासून होता. यातून दिवाळीच्या दिवशीच त्याने आत्महत्या केली.तेल्हारा (अकोला) : तालुक्यातील वरूड बिहाडे येथील ५६ वर्षीय शेतकºयाने सततची नापिकी आणि डोक्यावरील वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून दिवाळीच्या दिवशीच विष प्राशन करून आत्महत्या केली. वासुदेव महादेव बिहाडे यांना गेल्या काही वर्षांपासून शेतीत अपेक्षित उत्पन्न होत नव्हते. अल्प उत्पादनामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतच त्यांनी १९ आॅक्टोबर रोजी विष प्राशन केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. बिहाडे व त्यांच्या पत्नीचे नावे बँकेचे कर्ज आहे.दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच येथील अंबादास ठोसर या युवा शेतकºयाने आपली जीवनयात्रा संपविली होती. दिवाळीच्या दिवशीच झालेल्या या दोन आत्महत्यांमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले असा मोठा आप्त परिवार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्याMaharashtraमहाराष्ट्र