सातही दिवस दुकाने खुली!
By Admin | Updated: March 22, 2015 02:39 IST2015-03-22T01:59:03+5:302015-03-22T02:39:37+5:30
महाराष्ट्रातील व्यापारी, व्यावसायिकांना आता वर्षातील ३६५ दिवसही आपली दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. या दुकानांना आतापर्यंत आठवड्यातून एक दिवस सुटी बंधनकारक होती.

सातही दिवस दुकाने खुली!
नोकरांना साप्ताहिक सुटी बंधनकारक : महिला कर्मचाऱ्यांना रात्री ९.३० पर्यंत काम !
मुंबई : महाराष्ट्रातील व्यापारी, व्यावसायिकांना आता वर्षातील ३६५ दिवसही आपली दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. या दुकानांना आतापर्यंत आठवड्यातून एक दिवस सुटी बंधनकारक होती. मात्र आता राज्य शासनाने हे बंधन उठविले आहे. महिला कर्मचाऱ्यांना रात्री ८ नंतर कामावर ठेऊ नये, असे आदेश होते. आता त्यात दीड तासाची सवलत देत ही वेळ रात्री ९.३० अशी करण्यात आली आहे.
व्यापारी, व्यावसायिक कर्मचाऱ्यांना सुटी देत नाहीत, म्हणून आठवड्यातून एक दिवस दुकान बंद ठेवण्याची सक्ती शासनाने केली होती. परिणामत: ठोक व चिल्लर विक्रेते आठवड्यातून एक दिवस आपले दुकान बंद ठेवत होते. त्या त्या शहरातील व बाजार ओळीतील परंपरेनुसार कुठे रविवार, कुठे मंगळवार तर कुठे बुधवारी दुकाने बंद राहत होती. या व्यापाऱ्यांना होळी-दिवाळीसारख्या सणांना दुकान उघडे ठेवायचे असेल तर कामगार विभागाकडून विशेष परवानगी घ्यावी लागत होती. विनापरवानगी दुकान उघडे दिसल्यास कारवाईला सामोरे जावे लागत होते. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ही समस्या अधिक होती. नव्या अधिसूचनेमुळे या जाचातून आता व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे.
आता दुकान वर्षाचे संपूर्ण ३६५ दिवस खुले ठेवता येणार असले तरी कर्मचाऱ्यांना मात्र आठवड्यातून एक दिवस सुटी बंधनकारक आहे. त्यात केवळ त्यांना रोटेशनने सुटी देण्याची सवलत देण्यात आली आहे.
च्एका दिवशी ९ तासांपेक्षा अधिक व आठवड्यात ४८ तासांपेक्षा अधिक
काम कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जाणार नाही याची खबरदारी व्यापारी-व्यावसायिकांना घ्यावी लागेल.
च्मध्य प्रदेश, दिल्लीत सर्व दिवस व्यापार सुरू ठेवण्याची सवलत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील रिटेल व्यापारी महासंघाने हा पॅटर्न लागू करण्याची मागणी केली. शासनाने ती मान्य केली.
च्वर्षभरासाठी ही सवलत लागू असून, त्यानंतर फेरआढावा घेऊन ही सवलत कायम ठेवायची की बंद करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.
३५ लाख दुकानदारांना याचा
फ ायदा होईल. आठवडाभर मॉल, बडी दुकाने सुरू राहायची. मात्र एक दिवसाच्या सुटीची अट होती. ती काढल्याने व्यवसाय नक्कीच वाढेल. नोकरांना एक दिवस सुटी देण्याची अट नक्कीच पाळू.
- वीरेन शहा, अध्यक्ष, फेडरेशन आॅफ
रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन
आतापर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठान आठवड्यातून एक दिवस बंद राहत असल्याने कामगारांना हक्काची सुटी मिळायची. आता ती प्रतिष्ठानच्या मालकांच्या मर्जीवर अवलंबून राहील, असा धोका नवीन आदेशात आहे. सुटीची अंमलबजावणी होते की नाही, यावर कामगार विभागाने लक्ष ठेवले पाहिजे.
- एम. ए.पाटील
अध्यक्ष, सर्व श्रमिक संघ.