शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

१०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी; विनामूल्य सेवेला १० वर्षे पूर्ण

By दीपक भातुसे | Updated: July 7, 2024 07:11 IST

‘डायल १०८’ रुग्णवाहिकेची सेवा राज्यातील कोट्यवधी रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायिनी ठरली

ग्रामीण आणि निमशहरी भागात रुग्णांना उपचारासाठी किंवा रुग्णालयात नेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. दुर्गम आदिवासी भागात तर रुग्णांचे सर्वाधिक हाल होत होते; मात्र महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस) या प्रकल्पांतर्गत २६ जानेवारी २०१४ रोजी राज्यात ‘डायल १०८’ रुग्णवाहिकेची सेवा सुरू झाली आणि राज्यातील कोट्यवधी रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायिनी ठरली आहे. ही सेवा सुरू होऊन आता १० वर्षे पूर्ण झाली आहेत. कुणी आजारी असेल, अपघात झाला असेल किंवा तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज असेल तेव्हा १०८ रुग्णवाहिका विनामूल्य सेवेसाठी तत्पर असते. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग व भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी इंडिया) संयुक्त विद्यमाने ही सेवा मागील १० वर्षे राज्यात ठिकठिकाणी चालविण्यात येत आहे. या दहा वर्षांच्या कालावधीत राज्यात १०८ रुग्णवाहिकेमध्ये ४०,२१३ प्रसूती करण्यात आल्या आहेत. तसेच ४,०३४ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासाची (व्हेंटिलेटर) सुविधा देण्यात येऊन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आणि रुग्णालयात हलवण्यात आले.

१,००,०३,४४६ रुग्णांना मिळाली सेवा

राज्यात कोणत्याही ठिकाणावरून मोबाईल अथवा दूरध्वनीवरून १०८ क्रमांक डायल करताच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना विनामूल्य आणि वेळेत रुग्णवाहिका सेवा देण्यात येते. सेवा सुरू झाली तेव्हापासून जून २०२४ पर्यंत अपघाती घटनांमध्ये रुग्णवाहिकेमधून ५,२२,६८२ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यात आले आहे. 

९७% रुग्णांकडून उत्कृष्ट अभिप्राय

या सेवेचा फायदा झालेल्या ९७% रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी प्रणालीसाठी उत्कृष्ट अभिप्राय दिला आहे. या सेवेला एसकेओसीएचद्वारे (सरकारमधील योगदानाची मान्यता देणारी संस्था) भारतातील सर्वोत्तम शासित प्रणाली म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. 

२०२३ मध्ये बीव्हीजी-एमईएमएसला दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट कार्यान्वित आणि व्यवस्थापित प्रकल्प म्हणून ‘द रॉयल इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड सर्वेअर्स’द्वारे सन्मानित करण्यात आले आहे. ३ ऑगस्ट २०२३ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात बीव्हीजी इंडिया लिमिटेडला या सेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

जागतिक दर्जाच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने एमईएमएस शोधनिबंधाची निवड केली आहे. ‘नेचर’, जे सर्वोत्तम वैज्ञानिक नियतकालिकांपैकी एक आहे, ज्यामध्ये एमईएमएसवर वैज्ञानिक अहवाल प्रकाशित झाला आहे.

राज्यात ९३७ रुग्णवाहिका

राज्यात सध्या अशा ९३७ रुग्णवाहिका असून सर्व रुग्णवाहिकेत पल्स ऑक्सिमीटर, मेडिकल ऑक्सिजन यंत्रणा सज्ज असते. ही देशातील अविरत २४ तास डॉक्टर व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेसह असणारी एकमेव यंत्रणा आहे.

नाशिक येथील महाकुंभमेळा कालावधीत १,०७,२०० रुग्णांना सेवा दिली असून पंढरपूरच्या वारीमध्ये २,८९,६४६ आणि गणपती उत्सवात ४,६८४ रुग्णांना सेवा दिली आहे. कोरोनाच्या कठीण काळातही ही सेवा जीवनदायी ठरली आहे.

रुग्णांना सेवा 

राज्यात १ कोटी ३ हजार ४४६ रुग्णांना सेवा मिळाली आहे 

२९,२५३आगीच्या घटना  ७५,५९३हृदयरोग  १,५८,६४८उंचावरून पडून जखमी  २,३२,४२६विषबाधा प्रकरण १६,५६,०९४ प्रसूतीवेळी सेवा ६,९४९ शॉक किंवा वीज पडून जखमी  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार