शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
2
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
3
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
4
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
5
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
6
संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ
7
Astro Tips: 'या' उपायामुळे सोमवार २१ एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो!
8
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
9
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार
10
‘२.५ कोटी रुपये पगार असावा आणि...!’ भावी नवऱ्याकडून तरुणीच्या अपेक्षांची मोठी लिस्ट, व्हायरल पोस्ट चर्चेत
11
IPO आणण्याच्या तयारीत PhonePe, नावही बदललं; भारतात लिस्टिंगच्या तयारीला वेग
12
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
13
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
14
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
16
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका
18
Anaya Bangar Boy to Girl Transition Story: संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
19
तमन्ना भाटियासारखं फिट आणि सुंदर दिसायचंय? अभिनेत्रीने सांगितलेला सीक्रेट डाएट प्लान करा फॉलो
20
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!

१०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी; विनामूल्य सेवेला १० वर्षे पूर्ण

By दीपक भातुसे | Updated: July 7, 2024 07:11 IST

‘डायल १०८’ रुग्णवाहिकेची सेवा राज्यातील कोट्यवधी रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायिनी ठरली

ग्रामीण आणि निमशहरी भागात रुग्णांना उपचारासाठी किंवा रुग्णालयात नेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. दुर्गम आदिवासी भागात तर रुग्णांचे सर्वाधिक हाल होत होते; मात्र महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस) या प्रकल्पांतर्गत २६ जानेवारी २०१४ रोजी राज्यात ‘डायल १०८’ रुग्णवाहिकेची सेवा सुरू झाली आणि राज्यातील कोट्यवधी रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायिनी ठरली आहे. ही सेवा सुरू होऊन आता १० वर्षे पूर्ण झाली आहेत. कुणी आजारी असेल, अपघात झाला असेल किंवा तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज असेल तेव्हा १०८ रुग्णवाहिका विनामूल्य सेवेसाठी तत्पर असते. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग व भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी इंडिया) संयुक्त विद्यमाने ही सेवा मागील १० वर्षे राज्यात ठिकठिकाणी चालविण्यात येत आहे. या दहा वर्षांच्या कालावधीत राज्यात १०८ रुग्णवाहिकेमध्ये ४०,२१३ प्रसूती करण्यात आल्या आहेत. तसेच ४,०३४ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासाची (व्हेंटिलेटर) सुविधा देण्यात येऊन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आणि रुग्णालयात हलवण्यात आले.

१,००,०३,४४६ रुग्णांना मिळाली सेवा

राज्यात कोणत्याही ठिकाणावरून मोबाईल अथवा दूरध्वनीवरून १०८ क्रमांक डायल करताच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना विनामूल्य आणि वेळेत रुग्णवाहिका सेवा देण्यात येते. सेवा सुरू झाली तेव्हापासून जून २०२४ पर्यंत अपघाती घटनांमध्ये रुग्णवाहिकेमधून ५,२२,६८२ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यात आले आहे. 

९७% रुग्णांकडून उत्कृष्ट अभिप्राय

या सेवेचा फायदा झालेल्या ९७% रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी प्रणालीसाठी उत्कृष्ट अभिप्राय दिला आहे. या सेवेला एसकेओसीएचद्वारे (सरकारमधील योगदानाची मान्यता देणारी संस्था) भारतातील सर्वोत्तम शासित प्रणाली म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. 

२०२३ मध्ये बीव्हीजी-एमईएमएसला दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट कार्यान्वित आणि व्यवस्थापित प्रकल्प म्हणून ‘द रॉयल इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड सर्वेअर्स’द्वारे सन्मानित करण्यात आले आहे. ३ ऑगस्ट २०२३ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात बीव्हीजी इंडिया लिमिटेडला या सेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

जागतिक दर्जाच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने एमईएमएस शोधनिबंधाची निवड केली आहे. ‘नेचर’, जे सर्वोत्तम वैज्ञानिक नियतकालिकांपैकी एक आहे, ज्यामध्ये एमईएमएसवर वैज्ञानिक अहवाल प्रकाशित झाला आहे.

राज्यात ९३७ रुग्णवाहिका

राज्यात सध्या अशा ९३७ रुग्णवाहिका असून सर्व रुग्णवाहिकेत पल्स ऑक्सिमीटर, मेडिकल ऑक्सिजन यंत्रणा सज्ज असते. ही देशातील अविरत २४ तास डॉक्टर व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेसह असणारी एकमेव यंत्रणा आहे.

नाशिक येथील महाकुंभमेळा कालावधीत १,०७,२०० रुग्णांना सेवा दिली असून पंढरपूरच्या वारीमध्ये २,८९,६४६ आणि गणपती उत्सवात ४,६८४ रुग्णांना सेवा दिली आहे. कोरोनाच्या कठीण काळातही ही सेवा जीवनदायी ठरली आहे.

रुग्णांना सेवा 

राज्यात १ कोटी ३ हजार ४४६ रुग्णांना सेवा मिळाली आहे 

२९,२५३आगीच्या घटना  ७५,५९३हृदयरोग  १,५८,६४८उंचावरून पडून जखमी  २,३२,४२६विषबाधा प्रकरण १६,५६,०९४ प्रसूतीवेळी सेवा ६,९४९ शॉक किंवा वीज पडून जखमी  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार