शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
5
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
6
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
7
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
8
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
9
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
10
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
11
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
12
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
13
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
14
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
15
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
16
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
17
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
18
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
19
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
20
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!

अमरावती दंगलीसाठी मुंबईतून पैसा पाठवला; मंत्री नवाब मलिकांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 16:38 IST

अमरावतीबाहेर कुठेही हिंसाचार घडला नाही. समुदायात तेढ निर्माण करण्याचं राजकारण महाराष्ट्राच्या जमिनीवर चालणार नाही असं मलिकांनी सांगितले.

मुंबई – रझा अकदामीबद्दल जो काही तपास करायचा असेल तो पोलीस करत आहेत. परंतु भाजपा नेते आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात काय करताय? त्याचा फोटो माझ्याकडे आहे. पोलीस याचा तपास करेल. अमरावतीत कुठल्याही समुदायात दंगल घडली नाही. अमरावतीत माजी मंत्र्यांकडून २ तारखेच्या रात्री प्लॅनिंग रचण्यात आलं. काही तरुणांना पैसे देऊन दंगल भडकवण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

मंत्री नवाब मलिक म्हणाले की, अमरावतीत दंगल पेटवण्यासाठी दारु, पैसे वाटण्यात आले. त्यासाठी मुंबईतून पैशांचा पुरवठा करण्यात आला. ते पैसे लोकांना वाटण्यात आले. अमरावती शहरात दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. पोलीस तपासात हे उघड झालं त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली. सर्व अस्त्र संपल्यानंतर भाजपाचं दंगलीचं हत्यार बाहेर काढते. भाजपा दंगलीच्या माध्यमातून महाराष्ट्रात राजकारण खेळत आहे. महाराष्ट्राची जनता भाजपाच्या या राजकारणाला कधीच स्वीकारणार नाही. अमरावतीबाहेर कुठेही हिंसाचार घडला नाही. समुदायात तेढ निर्माण करण्याचं राजकारण महाराष्ट्राच्या जमिनीवर चालणार नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रात येऊन येथील सरकार उखडून टाकू असं विधान करतात. परंतु कुठलंही सरकार लोकांमुळे आणि बहुमताने निवडून येते. परंतु सरकार उखडण्याची भाजपाची पद्धत ही आहे की, आमदारांना खरेदी करण्याचं काम, प्रलोभन दिले. हा सगळा खेळ गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेशात पाहिला गेला परंतु हे महाराष्ट्रात चालणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे विरोधी नेत्यांवर दबाव टाकला जातो. पश्चिम बंगालमध्ये ज्यारितीने नेत्यांना घाबरवून भाजपात सामील करून घेतलं. पण निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा हे लोक टीएमसीत जात आहे. महाराष्ट्रातही असेच राजकारण केले. शरद पवारांना नोटीस देण्याचं काम केले. महाराष्ट्र सरकार उखडून फेकण्याचं स्वप्न भाजपानं सोडावं. महाराष्ट्राच्या सरकारचं चुंबक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेशी जोडली आहे. महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष चालणार आहे. मागील काही दिवसांपासून NCB कारवाईचा भांडाफोड केला आहे. आम्हाला ईडी, सीबीआय, एनसीबी कुठल्याही यंत्रणेकडून घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही असा इशारा नवाब मलिकांनी(Nawab Malik) दिला.  

टॅग्स :nawab malikनवाब मलिकBJPभाजपा