शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

...तर मी योग्य निर्णय घेण्यास सक्षम, राजन साळवींचं सूचक विधान; वरिष्ठांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 19:43 IST

माझ्या मतदारसंघातील अनेक मंडळी, पदाधिकारी यांनी तुम्ही योग्य निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत असे संकेत दिले आहेत असंही राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी - कोकणात माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गट सोडण्याचे संकेत दिले आहेत. राजापूर आणि लांजा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर राजन साळवी यांनी पक्षातील वरिष्ठ नेते माझ्या पराभवाला कारणीभूत आहेत असा आरोप करत भविष्यात योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्यास मी सक्षम आहे असं थेट विधान केले आहे. 

लांजा येथील कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर राजन साळवींनी माध्यमांशी संवाद साधला. साळवी म्हणाले की, गेले काही दिवस प्रसारमाध्यमातून विविध चर्चा रंगल्या आहेत. मला पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आमच्याशी संवाद साधावा. त्यानंतर मी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यात राजन साळवी यांच्यावर अन्याय झालेला आहे असा सूर कार्यकर्त्यांचा होता. पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहेत. तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यावेळी मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. लांजा येथील पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. भविष्यात योग्य वेळी योग्य तो निर्णय निश्चित घेईन अशा भावना मी कार्यकर्त्यांसमोर मांडल्या आहेत असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय माझ्या पराभवाला कारणीभूत काही वरिष्ठ मंडळी आहेत. मी त्यांचे नाव घेणार नाही. ते शोधणे गरजेचे आहे. आज जो दु:खाचा डोंगर पक्षावर, माझ्यावर वैयक्तिक माझ्या कुटुंबावर आला याला कारणीभूत कोण आहेत हे शोधणे गरजेचे आहे. जर नाही शोधले तर भविष्यात आज जी माझ्यावर वेळ आली आहे ती अन्य कुणावरही येऊ शकते. ती वेळ येऊ नये त्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने निर्णय घेतला पाहिजे. त्यासाठी मी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मी सक्षम आहे. माझ्या मतदारसंघातील अनेक मंडळी, पदाधिकारी यांनी तुम्ही योग्य निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत असे संकेत दिले आहेत असंही राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

२४ तासानंतर राजन साळवींचा यू टर्न?

मागील काळात कोकणातील माजी आमदार राजन साळवी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. त्यावर गुरुवारी राजन साळवी यांनी भाष्य केले. ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. २०२४ मध्ये झालेल्या पराभावाला आम्ही सामोरे गेलो. पराभवाचे दुःख, खंत आणि वेदना माझ्यासकट मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असताना भविष्याकडेही शिवसेना मार्गक्रमण करत आहे. मीडियातून मला समजले की, मी नाराज आहे. भाजपा किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसे काही नाही. रोजच्या कामात माझे मार्गक्रमण सुरू आहे. अशा बातम्या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार. यात कोणतीही शंका नाही, असे राजन साळवी यांनी सांगितले होते. त्यानंतर आज साळवींनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :Rajan Salviराजन साळवीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना