विक्रेते म्हणतात, बियाण्यांची नो गॅरंटी

By Admin | Updated: June 19, 2014 00:54 IST2014-06-19T00:54:36+5:302014-06-19T00:54:36+5:30

राज्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने फेल आले आहेत. या कंपन्यांचे २५० क्विंटल बियाणे परत करण्यात आले असून त्यांच्या विरोधात खटला भरण्याच्या

Sellers say no guarantee of seeds | विक्रेते म्हणतात, बियाण्यांची नो गॅरंटी

विक्रेते म्हणतात, बियाण्यांची नो गॅरंटी

लाखोंचे बियाणे परत : चार कंपन्यांविरोधात खटला दाखल करण्याच्या हालचाली
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
राज्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने फेल आले आहेत. या कंपन्यांचे २५० क्विंटल बियाणे परत करण्यात आले असून त्यांच्या विरोधात खटला भरण्याच्या हालचाली कृषी विभागाने सुरू केल्या आहे. अशा स्थितीत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उगवन क्षमतेसंदर्भात नो गॅरेंटीचा सुर आळवणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.
जिल्हयात तीन लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड होणार आहे. त्याकरिता दोन लाख ५६ हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात एक लाख ८६ हजार हेक्टरवर बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यास्थितीत बोगस बियाणे बाजारात आले. कृषी विभागाच्या धाडीत ते उघड झाले. अशा चार कंपन्या विरोधात कृषी विभागाने न्यायालयात खटला भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. याच लॉटचे बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या घरात पोहचण्याचा धोका आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सावध पावले उचलणे सुरू केले आहे. बियाण्यांची उगवण क्षमता कशी आहे, त्याची गॅरंटी आहे का, असे प्रश्न विचारताच विक्रेत्यांनी त्यांना नो गॅरंटी असे सांगणे सुरू केले आहे.
अल निनोने शेतकरी धास्तावले
हवामान खात्याने यावर्षी कमी पावसाचा अंदाज वर्तविला. सोेबत अल निनोचा धोका वर्तविला आहे. या स्थितीत बियाणे बोगस असल्यास दुबार पेरणीची संधीच मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी बियाण्याच्या बाबतीत धास्तावले आहे.

Web Title: Sellers say no guarantee of seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.