शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

राज्यातील कारागृहांच्या सुरक्षेत होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 19:29 IST

दुरुस्ती व नुतनीकरणासाठी ९.४२ कोटीचा निधी राज्य सरकारकडून मंजूर

- जमीर काझीमुंबई : राज्यातील विविध कारागृहातील संरक्षक भिंती, बॅरेक आता सुरक्षिततेच्या दृष्टिने आणखी मजबूत होणार आहेत. खराब व नादुरुस्त कठड्याची दुरुस्ती व नुतनीकरण करण्यासाठी तब्बल ९.४२ कोटीचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. त्याद्वारे विविध लहान-मोठ्या १७ तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यात येणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने (पीडब्ल्यूडी) पाच महिन्यापूर्वी हा प्रस्ताव गृह विभागाला सादर केला होता. त्याला मंजुरी देताना याबाबतचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयात दोन वर्षापूर्वी दाखल असलेल्या एका जनहित याचिकेत राज्यातील कारागृहातील दुरावस्थेबद्दल सरकारला फटकारले होते. त्यानंतर सरकारकडून कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार विविध कामाची पूर्तता करण्यात येत असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.न्यायालयाच्या आदेशानंतर कारागृहातील परिस्थितीचा आढावा घेवून आवश्यक बाबीची पूर्तता करण्यासाठी विशेष महानिरीक्षकांची समिती नेमण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार एकुण २७ कारागृहात बांधकाम/ दुरुस्ती/नुतनीकरण करण्याबाबतचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यापैकी अत्यावश्यक असणाºया व मंजुरी मिळालेल्या १७ ठिकाणी तातडीने पीडब्ल्यूडीकडून हे काम हाती घेतले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार भायखळा कारागृहात रंगकाम गळती प्रतीबंधक उपाययोजना करण्यासाठी ३० लाख तर बॅरेक क्रमांक ३व ४ व त्या शेजारी नवीन बॅरेक बांधण्यासाठी ४० लाख खर्चात बांधण्यात येणार आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात बॅरेक बांधणे व येरवड्यातील ३९ बॅरकेच्या दुरुस्तीसाठी सुमारे ९८ लाख खर्च अपेक्षित आहे. येरवड्यातील महिला कारागृहात १०० कैदी क्षमतेचे स्वतंत्र बॅरेक बांधले जाणार असून त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृहातील विविध बॅरेक बांधण्यासाठी एकुण ४ कोटीचा प्रस्ताव देण्यात आलेला होता.महाराष्ट्रात एकुण ९ मध्यवर्ती कारागृहे असून त्याशिवाय जिल्हा स्तरावरील अ,ब, क व ड या चार स्तरावर ४५ असे एकुण ५४ कारागृह आहेत. त्याची अधिकृत बंदी क्षमता २३ हजार ९४२ इतकी असलीतरी प्रत्यक्षात ३१ हजार २१८ कैदी असल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामध्ये २१ हजार ८३३ पुरुष तर १३८५ महिला कैदी आहेत.जेलमधील बंदी क्षमता- २३९४२प्रत्यक्ष बंदीची संख्या- ३१२१८ 

 

टॅग्स :jailतुरुंगMaharashtraमहाराष्ट्र