शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

खरेच उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा कमी केली?; मुंबई पोलीस म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 19:03 IST

राजकीय सूड भावनेतून गद्दार सरकारने ठाकरेंची सुरक्षा कमी केली असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला तर VVIP सुरक्षेबाबत समिती वेळोवेळी आढावा घेऊन निर्णय घेत असते असं सरकारने म्हटलं

मुंबई - उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्याची माहिती समोर आली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत घट केल्याचं कळताच ठाकरे गटाच्या नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना आता झेड प्लसऐवजी झेड सुरक्षा देण्यात येणार आहे. तर आदित्य ठाकरे यांची वाय प्लस सुरक्षा काढून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली जाईल. परंतु या बातमीवर आता मुंबई पोलिसांकडूनही कुठलीही सुरक्षा कमी केल्याचं सांगण्यात येत आहे. ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यात जी अतिरिक्त वाहने होती ती हटवली असल्याचे म्हटलं आहे. 

राजकीय सूड भावनेतून गद्दार सरकारने ठाकरेंची सुरक्षा कमी केली असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला तर VVIP सुरक्षेबाबत समिती वेळोवेळी आढावा घेऊन निर्णय घेत असते असं सरकारने म्हटलं. परंतु पोलीस सूत्रांनुसार, उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या ताफ्यात अधिक वाहने होती आणि मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर त्यांच्याकडील ही वाहने प्रोटोकॉलनुसार काढून घेतली. उद्धव ठाकरेंना कालही झेड प्लस सुरक्षा होती आणि आजही आहे असं त्यांनी सांगितले. 

तर ठाकरे कुटुंबातील रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांना वाय प्लस-स्कॉट कॅटेगिरीची सुरक्षा दिलेली आहे. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या कुटुंबाला कॉनवॉय म्हणून १-१ वाहन अतिरिक्त देण्यात आले होते. ती ३ वाहने सध्या हटवण्यात आली आहे. परंतु सुरक्षेच्या दर्जात कमी केली नाही. अलीकडेच राज्यातील मोटार परिवहन विभागाकडून अतिरिक्त गाडी परत मागितल्याचे पत्र प्राप्त झाले त्यानंतर या अतिरिक्त गाड्या हटवण्यात आल्या आहेत. 

विनायक राऊतांनी साधला निशाणाअख्ख्या जगातील दहशतवादी आहेत त्यांच्या हिटलिस्टवर मातोश्री आहे. वर्षानुवर्षे मातोश्रीला सुरक्षा होती, वेळोवेळी ती वाढवण्यात आली होती. परंतु राज्यात गद्दारांचे सरकार आल्यानंतर आजपासून मातोश्रीचे मुख्य प्रवेशद्वार ते आतपर्यंत खूप मोठ्या संख्येने कपात केली आहे. द्वेष आणि घाणेरड्या राजकारणामुळे ही सुरक्षा कमी करण्यात आली. दुसरीकडे ठाण्यात नगरसेवक, त्यांच्या पत्नीला, पीएलाही सुरक्षा देण्यात आली आहे. गद्दारांना सुरक्षा दिली जाते पण मातोश्रीची सुरक्षा कपात केली जाते हा निदंनीय प्रकार आहे अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेMumbai policeमुंबई पोलीस